शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

राज्यासाठी दिलासादायक बातमी; दिवसभरात नवीन रुग्णांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 21:07 IST

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत

मुंबई - राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ८७ हजार ०३० रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७  हजार १७  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.

आज निदान झालेले ८९६८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७० (४६), ठाणे- २०३ (५), ठाणे मनपा-२४४ (५),नवी मुंबई मनपा-३२२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-२४७ (२),उल्हासनगर मनपा-५४ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२३ (२) , मीरा भाईंदर मनपा-१३० (४),पालघर-१३२, वसई-विरार मनपा-२२७ (३), रायगड-२३२ (३), पनवेल मनपा-१७३ (२), नाशिक-११४(३),नाशिक मनपा-३२३ (३), मालेगाव मनपा-२५, अहमदनगर-१८४ (१), अहमदनगर मनपा-१८६ (१), धुळे-१२ (१), धुळे मनपा-१२, जळगाव-२८० (६), जळगाव मनपा-१७३, नंदूरबार-३ (४), पुणे- २३१ (७), पुणे मनपा-७९६ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-७३१ (१३), सोलापूर-२०२(४), सोलापूर मनपा-६२ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-३९५ (५), कोल्हापूर मनपा-१५६ (४), सांगली-११४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-३६५ (५), सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-३१ (२), औरंगाबाद-८१, औरंगाबाद मनपा-२३७ (३), जालना-१९ (१), हिंगोली-१००, परभणी-१, परभणी मनपा-१०,लातूर-७६(५), लातूर मनपा-३१ (२), उस्मानाबाद-३५ (१), बीड-४१ (१), नांदेड-१२३ (१), नांदेड मनपा-१०३ (४), अकोला-२५ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती- ३७ (२), अमरावती मनपा-६३, यवतमाळ-३ (२), बुलढाणा-५१, वाशिम-८ (१), नागपूर-१०८ (९) , नागपूर मनपा-१७६ (४१), वर्धा-३, भंडारा-७, गोंदिया-६१, चंद्रपूर-१३, चंद्रपूर मनपा-३, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (३).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ००९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस