शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

काेराेना सक्रिय रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी घटली; राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:05 IST

राज्यात ९ जानेवारी रोजी ५२ हजार ९६० सक्रिय रुग्ण होते. यात मोठ्या प्रमाणात घट होऊन ८ फेब्रुवारी रोजी हे प्रमाण ३४ हजार ७२० वर आले आहे.

मुंबई : कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत मागील काही दिवसांत राज्यात दैनंदिन रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय मागील एका महिन्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात ९ जानेवारी रोजी ५२ हजार ९६० सक्रिय रुग्ण होते. यात मोठ्या प्रमाणात घट होऊन ८ फेब्रुवारी रोजी हे प्रमाण ३४ हजार ७२० वर आले आहे.टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अनलॉकचा पुढचा टप्पा आणि आता सर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांनी किमान पुढील सहा महिने तरी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता राखणे, मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, राज्यात सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे, ही बाब दिलासादायक आहे. मात्र, सामान्यांनीही संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्न केला पाहिजे. सोबतच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी सामान्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. लसीविषयी गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे.७३ टक्के खाटा रिक्तपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, सध्या शहर, उपनगरात कोरोना नियंत्रणात आहे. यंत्रणा संसर्ग पसरू नये यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, नागरिकांनीही योगदान देऊन मार्गदर्शक नियमांचे पालन करावे. ऑक्‍टोबर, नोव्हेंबरच्या तुलनेत दैनंदिन रुग्णांमध्येह घट झाली आहे. परिणामी, सध्या शहर व उपनगरात कोरोना रुग्णांसाठीच्या ७३ टक्के खाटा रिक्त आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या