शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

शिवसेनेच्या संघर्ष काळात आता उद्धव चिरंजीव तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 10:20 IST

शिवसेनेत असा गट तयार होतोय, अशी कल्पना मी साहेबांना दिली होती. परंतु असं होणार नाही. शिवसैनिक मला धोका देणार नाही अशी भावना उद्धव ठाकरेंची होती असा खुलासा हर्षल प्रधान यांनी केला.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ४० आमदार, १२ खासदार यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झालीय. दुसरीकडे शिवसेनेला बळकटी देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. आता तेजस ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री होणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी या विषयावर भाष्य केले आहे. प्रधान म्हणाले की, शिवसेना पक्ष म्हणून काम करतेय, कुणी कितीही दावे केले तरी त्याचा फरक पडत नाही. शिवसेना आजही, उद्याही आणि भविष्यातही काम करत राहणार आहे. शिवसेनेत घडत असलेल्या घडामोडीमुळे ठाकरे कुटुंब मनातून दुखावले गेले आहे. तरीही उद्धव ठाकरे कणखर आहेत, रश्मी ठाकरे त्यांच्या पाठिशी ठाम आहेत, आदित्य, तेजसही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहेत असं त्यांनी सांगितले तसेच तेजस ठाकरे यांनी राजकारणात यावं ही कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे, पण हा ठाकरे कुटुंबाचा प्रश्न आहे. सगळ्यांनी राजकारणात येण्यापेक्षा राजकीय व्यवस्थेला ताकदवान बनवून ती शिस्तबद्ध चालवणं हे जास्त गरजेचे आहे असं ते म्हणाले. 

शिंदेंच्या बंडाची आधीच होती कुणकुण शिवसेनेत असा गट तयार होतोय, अशी कल्पना मी साहेबांना दिली होती. परंतु असं होणार नाही. शिवसैनिक मला धोका देणार नाही अशी भावना उद्धव ठाकरेंची होती. निवडणुका येऊ द्या शिवसेना पुन्हा खंबीरपणे राज्यात उभी राहील. आता ६३ नाही तर शिवसेना १०० पर्यंत मजल मारेल. आदित्य ठाकरे दिवसेंदिवस प्रगल्भ राजकीय नेते बनत आहेत. ठाकरे कुटुंबाला राजकारण जमलं नाही. आपली माणसं सत्तेत बसावीत म्हणून शिवसेना राजकारणात आली. राजकारणात आपलं कोण असेल तर ती शिवसेना आहे असं मराठी माणसाला वाटतं. कितीही संकटं आली तरी आम्ही शिवसेनेसोबत राहणार आहे अशी भावना हर्षल प्रधान यांनी व्यक्त केली. 

बंडखोरांना जनता उत्तर देणारमाझ्याच माणसांनी माझा विश्वासघात केला हे दुखावणारं होतं असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे भावनिक राजकारणी आहेत. ते भावनेने विचार करतात. आम्ही सर्व महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरणार आहोत. सर्वसामान्यांचा पक्ष शिवसेना हेच आमचे धोरण आहे. आपल्याला राजकारण जमले नाही म्हणून ही वेळ आपल्यावर आली आहे. शिवसेना ठाकरे कुटुंबापासून दुरावून नेऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद उद्धव ठाकरेंकडेच आहेत. भात्यातील बाण घेऊन गेले तरी धनुष्य उद्धव ठाकरेंच्या हाती आहे. राज्यातील १३ कोटी जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभा आहे. निवडणुकीत बंडखोरांना जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही प्रधान यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. 

शिवसैनिकाला पदाचा मोह नाहीआदित्य ठाकरेंना मंत्रिपद मिळालं ते ज्यांना पदे मिळाली त्यांच्या मनात खुपत असेल परंतु शिवसैनिकाच्या मनात पदाचा मोह नाही, कुठलंही पद मागत नाही. आजही शिवसैनिक वडापाव खाऊन काम करतो. ज्यांना संधी मिळाली त्यात काहीजण सोने करतात तर काहीजण माती करतात. माती करणारे निघून गेले असंही हर्षल प्रधान यांनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे