शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

आता हातावर टाळी नाही, तर कानाखाली - राज, उद्धवचे नीच राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 05:37 IST

माझे सहा नगरसेवक फोडून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी अत्यंत नीच राजकारण केले आहे. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धवच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती.

 मुंबई : माझे सहा नगरसेवक फोडून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी अत्यंत नीच राजकारण केले आहे. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धवच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. त्यामुळे यापुढे हातावर नाही, तर गालावर टाळी देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर राज यांनी आज संतप्त शब्दांत टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, सेनेने केलेल्या या राजकारणाचा राज्यातील जनतेला राग आहे. शिवसेनेला आमचे नगरसेवक हवे होते तर मी सहा कशाला सातच्या सात नगरसेवक पाठवले असते. पण प्रत्येकी पाच पाच कोटी देऊन सहा नगरसेवक फोडले. सहा जण खरेदी करण्यासाठी तीस कोटी आणले कुठून? बरं एवढं करून सोशल मीडियावर असे भासवले जात आहे की, हे सगळं मी आणि उद्धवने मिळून केले. असले दळभद्री राजकारण मी कधी केले नाही आणि मला करताही येत नाही.दुसºयांचे नगरसेवक, आमदार फोडून मला माझा पक्ष उभा करायचा नाही. त्यामुळेच मी कोणत्याही पोटनिवडणुकीत कधीही उमेदवार उभे केले नाहीत. या घटनेनंतर मला शिवसेनेचे नगरसेवक म्हणाले, शिवसेनेपेक्षा आम्ही दुसºया पक्षात असतो तर बरे झाले असते. आम्हाला आमच्या पक्षात राहून कधी काही मिळाले नाही; पण बाहेरुन आलेल्यांना पाच पाच कोटी मिळाले अशा भावना शिवसेना नगरसेवकात आहेत, असा दावाही राज यांनी केला.महापौर बंगला की पार्टी करण्याचा अड्डा?बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात करायचे असे सांगितले जाते; मात्र त्याठिकाणी परवा शिवसेनेचे नगरसेवक रात्री पार्टी करत होते. पोलिसांना खबर लागली. काही पोलिस तिकडे येत आहेत असे कळताच सगळ्यांनी तेथून पळ काढला. त्याचे फोटोहीव्हायरल झाले. हे कसले बाळासाहेबांचे स्मारक करणार? असल्या घाणेरड्या राजकारणाची किळस येते असेही राज ठाकरे म्हणाले.दीड महिन्यापासून होती कुणकुण!फोडाफोडीचे राजकारण करून सेनेने मराठी माणसाचा घात केला. जाणाºया सहा नगरसेवकांबद्दल दीड महिन्यापासून कुणकुण होती. मात्र ज्यांनी स्वत:ला बाजारात विकायला ठेवले आहे, ते मानसिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत, त्यांना ठेवून तरी काय करणार? महाराष्ट्रात राजकारण उमदे असावे. कुणी आयुष्यभर सत्तेत राहत नाही. एखादी गोष्ट करताना चुकीचा पायंडा पाडत नाही ना, याचे भान पक्षांनी ठेवायला हवे, अशी अपेक्षाही राज यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना