शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रशासनाचे त्रयस्थ परीक्षण; माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:17 IST

ई-गव्हर्नन्स, बदली-नियुक्तीचे नियम, सेवाकर्मी कार्यक्रम अशा अनेक सुधारणा अंमलात आणण्यात आल्या असून, पुढील टप्प्यात प्रशासनाचे त्रयस्थ परीक्षण करण्यात येणार असल्याचे शेलार म्हणाले.

नागपूर : राज्याच्या प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान आणि परिणामकारक व्हावा यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत प्रशासनाचे परीक्षण केले जाईल, असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी विधानसभेत सांगितले.

'विकसित भारत २०४७'च्या धर्तीवर 'विकसित महाराष्ट्र' ही संकल्पना प्रभावीपणे राबविताना प्रशासनात जनसहभाग, सर्वेक्षण, विभागीय व आंतरविभागीय चर्चा, क्षमता-वर्धन कार्यक्रम तसेच 'मिशन कर्मयोगी' अंतर्गत प्रशासकीय कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. ई-गव्हर्नन्स, बदली-नियुक्तीचे नियम, सेवाकर्मी कार्यक्रम अशा अनेक सुधारणा अंमलात आणण्यात आल्या असून, पुढील टप्प्यात प्रशासनाचे त्रयस्थ परीक्षण करण्यात येणार असल्याचे शेलार म्हणाले.

भाजपचे श्रीकांत भारतीय यांनी प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला. या चर्चेला उत्तर देताना मंत्री शेलार म्हणाले, पुढील टप्प्यात प्रकल्पांचे जिओ-टॅगिंग, मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या माध्यमातून निधी, प्रकल्प व तक्रारींचे एकत्रित निरीक्षण, एआय-इनेबल डेटा अॅनालिसिस केले जाणार आहे.

राज्यात सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा अधिक बळकट करण्यासाठी राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत सुशासनासंदर्भातील कायद्याला मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी बहुआयामी यंत्रणा उभारण्यात आली आहे. 

या लक्षवेधीच्या माध्यमातून खासगी नामांकित संस्थांमार्फत मूल्यमापन, नागरिकांचा थेट अभिप्राय (सिटीझन फीडबॅक), महाराष्ट्र सिटीझन एक्सपीरियन्स इंडेक्स, विभागीय कामगिरीचे मूल्यमापन तसेच अपयशी प्रकल्पांबाबत निर्णयप्रक्रिया अशा पाच प्रमुख अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. राज्य शासनामार्फत सध्या सुमारे १६ विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे शेलार म्हणाले.

नागरिकांना सेवा व अभिप्रायाचे अधिकार

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिन 'सुशासन दिवस' म्हणून घोषित करून त्या निमित्ताने दरवर्षी सुशासन अहवाल प्रसिद्ध केला जातो, माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासकीय गती वाढविणे, लाइव्ह ट्रॅकिंग, फीडबॅक मेकॅनिझम, 'गती शक्ती' योजनेअंतर्गत महत्त्वाच्या प्रकल्पांचे परीक्षण तसेच 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'च्या माध्यमातून नागरिकांना सेवा व अभिप्रायाचे कायदेशीर अधिकार देण्यात आले असल्याचे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Government to Conduct Third-Party Audit of Administration: Minister Shelar

Web Summary : Maharashtra will conduct a third-party audit to improve administrative efficiency. Minister Shelar highlighted initiatives like citizen participation, skill development, and e-governance. Projects will be geo-tagged and monitored via a dashboard with AI analysis for enhanced governance and citizen-centric services.
टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलार