शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

आता नवी सुशासन नियमावली; सेवा कायदा आणि दप्तर दिरंगाई कायद्याला बळकटी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 12:12 IST

कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल, अशी नियमावली तयार करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गुरुवारी पार पडली.

मुंबई : लोकांची कामे जलदगतीने व्हावी, त्यांना शासकीय सेवांचा लाभ योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत मिळावा यासाठी आता सुशासन नियमावली केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.  कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल, अशी नियमावली तयार करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गुरुवारी पार पडली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष निवृत्त उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव तथा समिती सदस्य जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. शासन व नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याच्या अनुषंगाने सुशासन नियमावली तयारी केली जाणार आहे. प्रशासनाचे सुशासन होण्यासाठी  ही नियमावली उपयुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केला. प्रशासन गतिमान करतानाच माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शेतकऱ्यांसाठी जोडधंदा, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान यासाठी उपाययोजना सुचविताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी, नैसर्गिक आपत्तींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाही नियमावलीमध्ये समावेश करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी समितीला केली.    कुपोषणावरील उपाययोजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यावरदेखील समितीने उपाययोजना सुचवाव्यात असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

दप्तरी हेलपाटे नको !   दप्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नियमावलीमध्ये त्याचा समावेश करावा, असे सांगत लोकांचे काम वेळेवर झाले तरच त्याला सुशासन म्हणता येईल, नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नये, क्षेत्रीय स्तरावरच त्यांच्या समस्यांचा निपटारा व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विभागीय स्तरावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज अधिक गतिमान करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.   

 काय आहे सेवा हमी कायदा?- जनतेस सेवेचा हक्क देणारा कायदा - विविध दाखले, प्रमाणपत्रे वितरण यांच्यासह १०५ सेवांचा समावेश- जनतेस पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त- कायद्यात नमूद दिवसांत सेवा दिली नाही तर ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड, काही प्रकरणात निलंबनाची कारवाई काय आहे दप्तर दिरंगाई कायदा? - शासकीय अधिकाऱ्यांना एखादी फाईल अडवून ठेवण्यास प्रतिबंध घालण्यासाठी कायदा- माहितीचा अधिकार कायदा प्रभावीपणे अंमलात यावा यासाठी हा कायदा - शासकीय अधिकाऱ्याने एखादी फाईल ठरावीक दिवसांत पुढे पाठविण्याची तरतूद, अन्यथा कारवाई 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारGovernmentसरकार