शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचे - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:29 IST

राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाली आहे. या मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच यापुढे दर सहा महिन्यांनी वृक्ष लागवडीचे लेखापरीक्षण केले जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.वृक्ष लागवडीतून पर्यावरण रक्षण होत असल्याने सजीवांच्या निरोगी आयुष्यासाठी ही बाब महत्वाची आहे. वृक्षाच्छादन तसेच रोजगार, उत्पन्न वृद्धीही अपेक्षित आहे. याच भावनेतून राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. पहिल्या टप्प्यात दोन कोटी ८२ लाख, दुसऱ्या टप्यात पाच कोटी ४३ लाख वृक्षांची लागवड केली होती, यंदा १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाल्याचे त्यांनी सांगितले.औरंगाबाद जिल्ह्याने सर्वाधिक ९६ लाख, नांदेड जिल्ह्याने ८२ लाख झाडांची लागवड केली. मागील दोन वर्षांत लावलेल्या झाडांपैकी सुमारे ७७ टक्के झाडे जगली आहेत. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २७३ चौरस किमीने वाढले आहे. राष्ट्रीय वन नीतीनुसार ३३ टक्के वनक्षेत्र करण्यासाठी आणखी १३ टक्के वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. यासाठी साधारणत: ४०० कोटी वृक्ष लावणे, जगवणे आवश्यक आहे. लावलेली झाडे किती प्रमाणात जगली याच्या तपासणीसाठी जिल्हा, गाव पातळीवर समित्या स्थापन करण्यात येतील. दर सहा महिन्यांनी वृक्ष लागवडीचे आॅडिट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार