शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचे - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:29 IST

राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाली आहे. या मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच यापुढे दर सहा महिन्यांनी वृक्ष लागवडीचे लेखापरीक्षण केले जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.वृक्ष लागवडीतून पर्यावरण रक्षण होत असल्याने सजीवांच्या निरोगी आयुष्यासाठी ही बाब महत्वाची आहे. वृक्षाच्छादन तसेच रोजगार, उत्पन्न वृद्धीही अपेक्षित आहे. याच भावनेतून राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. पहिल्या टप्प्यात दोन कोटी ८२ लाख, दुसऱ्या टप्यात पाच कोटी ४३ लाख वृक्षांची लागवड केली होती, यंदा १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाल्याचे त्यांनी सांगितले.औरंगाबाद जिल्ह्याने सर्वाधिक ९६ लाख, नांदेड जिल्ह्याने ८२ लाख झाडांची लागवड केली. मागील दोन वर्षांत लावलेल्या झाडांपैकी सुमारे ७७ टक्के झाडे जगली आहेत. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २७३ चौरस किमीने वाढले आहे. राष्ट्रीय वन नीतीनुसार ३३ टक्के वनक्षेत्र करण्यासाठी आणखी १३ टक्के वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. यासाठी साधारणत: ४०० कोटी वृक्ष लावणे, जगवणे आवश्यक आहे. लावलेली झाडे किती प्रमाणात जगली याच्या तपासणीसाठी जिल्हा, गाव पातळीवर समित्या स्थापन करण्यात येतील. दर सहा महिन्यांनी वृक्ष लागवडीचे आॅडिट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार