शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

आता भारताच्या तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 05:40 IST

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हजारो शूरवीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते; पण, पंडित नेहरूंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने प्रगतीचा पाया रचला. ७८ वर्षे हा तिरंगा डौलाना फडकत आहे; पण, आता तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलेच नाही. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित करून त्या राज्याला टार्गेट केले. पश्चिम बंगालमधील घटनेचे समर्थन कोणीही करीत नाही. अशाच व यापेक्षा भयंकर घटना भाजपशासित राज्यात झाल्या, त्यावर पंतप्रधानांनी कधीच भाष्य केले नाही; पण, पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाचे सरकार असल्याने जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आल्याचे पटोले म्हणाले.

गांधी-नेहरू कुटुंबावर टीका करताना भाजपमधील परिवारवादाकडेही पंतप्रधानांनी लक्ष द्यायला हवे. गांधी - नेहरू कुटुंबाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्याग केला आहे. या कुटुंबाने आपली संपत्तीसुद्धा देशासाठी दान केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ९ वर्षे जेलमध्ये काढली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला; पण, २०१४ साली देशाला स्वातंत्र मिळाले असे मानणारे काही लोक आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे पटोले म्हणाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNana Patoleनाना पटोले