शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आता भारताच्या तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 05:40 IST

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हजारो शूरवीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते; पण, पंडित नेहरूंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने प्रगतीचा पाया रचला. ७८ वर्षे हा तिरंगा डौलाना फडकत आहे; पण, आता तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलेच नाही. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित करून त्या राज्याला टार्गेट केले. पश्चिम बंगालमधील घटनेचे समर्थन कोणीही करीत नाही. अशाच व यापेक्षा भयंकर घटना भाजपशासित राज्यात झाल्या, त्यावर पंतप्रधानांनी कधीच भाष्य केले नाही; पण, पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाचे सरकार असल्याने जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आल्याचे पटोले म्हणाले.

गांधी-नेहरू कुटुंबावर टीका करताना भाजपमधील परिवारवादाकडेही पंतप्रधानांनी लक्ष द्यायला हवे. गांधी - नेहरू कुटुंबाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्याग केला आहे. या कुटुंबाने आपली संपत्तीसुद्धा देशासाठी दान केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ९ वर्षे जेलमध्ये काढली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला; पण, २०१४ साली देशाला स्वातंत्र मिळाले असे मानणारे काही लोक आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे पटोले म्हणाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNana Patoleनाना पटोले