शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता राष्ट्रवादीलाही भगव्याची भूरळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:51 IST

सध्या राष्ट्रवादीतून अनेक नेते पलायन करत असून भाजप किंवा शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेत आहेत. परंतु, आता यापुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातात देखील भगवा झेंडा दिसणार आहे.

मुंबई - देशाचं राजकारण मागील कित्येक वर्षांपासून भगव्या रंगाच्या आजुबाजूला फिरत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच भगव्या रंगाला महत्त्व प्राप्त आहे. परंतु, भारतावर इंग्रजांचे राज्य असताना देशातील नागरिक तिरंग्या झेंड्याखाली एकत्र येऊ लागले. आजही तिरंग्यासमोर सर्वजन नतमस्तक होतात. परंतु, अनेक राजकीय पक्षांमध्ये भगव्या रंगालाच अधिक महत्त्व देण्यात येते. यामध्ये हिंदुत्ववादी विचारधारा असणाऱ्या शिवसेना आणि भाजप यांचा समावेश होते. परंतु, यात आता राष्ट्रवादीही सामील होणार आहे.

धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला राष्ट्रवादी पक्ष यापुढे आपल्या कार्यक्रमात दोन झेंडे ठेवणार आहे. पक्षाचा एक आणि दुसरा भगवा झेंडा राष्ट्रवादीच्या सभेत असावा अशी घोषणाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे यापुढे सभेत ठेवण्याच्या सूनचा पवार यांनी केल्या. त्यामुळे राष्ट्रवादीलाही भगव्याची भूरळ पडली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशात आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का ? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये 'शिवरायांचा भगवा' आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघाले होते. त्यात छत्रपती शिवाजी महाजारांचा फोटो असलेले भगवे झेंड वारण्यात आले होते. ज्या जिल्ह्यात मोर्चे असतील तो जिल्हा मोर्चाच्या दिवशी भगवा होत असे. या भगव्या खाली लाखोंच्या संख्येने मराठा समाज जमला होता. तोच पॅटर्न राष्ट्रवादीने राबविण्याचा निश्चय केलेला दिसत आहे.

याआधी शिवसेनेकडून सर्वाधिक प्रमाणात भगव्याचा उदो उदो करण्यात येत होता. मात्र यापुढे राष्ट्रवादीही भगव्या खाली एकत्र येणार आहे. सध्या राष्ट्रवादीतून अनेक नेते पलायन करत असून भाजप किंवा शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेत आहेत. परंतु, आता यापुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातात देखील भगवा झेंडा दिसणार आहे.