शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आता राष्ट्रवादीलाही भगव्याची भूरळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:51 IST

सध्या राष्ट्रवादीतून अनेक नेते पलायन करत असून भाजप किंवा शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेत आहेत. परंतु, आता यापुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातात देखील भगवा झेंडा दिसणार आहे.

मुंबई - देशाचं राजकारण मागील कित्येक वर्षांपासून भगव्या रंगाच्या आजुबाजूला फिरत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच भगव्या रंगाला महत्त्व प्राप्त आहे. परंतु, भारतावर इंग्रजांचे राज्य असताना देशातील नागरिक तिरंग्या झेंड्याखाली एकत्र येऊ लागले. आजही तिरंग्यासमोर सर्वजन नतमस्तक होतात. परंतु, अनेक राजकीय पक्षांमध्ये भगव्या रंगालाच अधिक महत्त्व देण्यात येते. यामध्ये हिंदुत्ववादी विचारधारा असणाऱ्या शिवसेना आणि भाजप यांचा समावेश होते. परंतु, यात आता राष्ट्रवादीही सामील होणार आहे.

धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला राष्ट्रवादी पक्ष यापुढे आपल्या कार्यक्रमात दोन झेंडे ठेवणार आहे. पक्षाचा एक आणि दुसरा भगवा झेंडा राष्ट्रवादीच्या सभेत असावा अशी घोषणाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे यापुढे सभेत ठेवण्याच्या सूनचा पवार यांनी केल्या. त्यामुळे राष्ट्रवादीलाही भगव्याची भूरळ पडली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशात आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का ? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये 'शिवरायांचा भगवा' आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघाले होते. त्यात छत्रपती शिवाजी महाजारांचा फोटो असलेले भगवे झेंड वारण्यात आले होते. ज्या जिल्ह्यात मोर्चे असतील तो जिल्हा मोर्चाच्या दिवशी भगवा होत असे. या भगव्या खाली लाखोंच्या संख्येने मराठा समाज जमला होता. तोच पॅटर्न राष्ट्रवादीने राबविण्याचा निश्चय केलेला दिसत आहे.

याआधी शिवसेनेकडून सर्वाधिक प्रमाणात भगव्याचा उदो उदो करण्यात येत होता. मात्र यापुढे राष्ट्रवादीही भगव्या खाली एकत्र येणार आहे. सध्या राष्ट्रवादीतून अनेक नेते पलायन करत असून भाजप किंवा शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेत आहेत. परंतु, आता यापुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातात देखील भगवा झेंडा दिसणार आहे.