शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता मराठीची पताका जगभर उंचावेल

By admin | Updated: February 16, 2015 02:09 IST

अभिजात दर्जा मिळाल्यावर मराठी अधिक शक्तीशाली हरी नरके यांना विश्‍वास.

विवेक चांदूरकर / अकोला

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस केंद्रीय भाषातज्ज्ञ समितीने केंद्र सरकारला केली आहे. त्यामुळे आता लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा होणार असून, यामुळे मराठीची पताका जगभर पसरून ती शक्तीशाली भाषा होईल, असा विश्‍वास अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनी रविवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. हरी नरके माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आले होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेचा किती विकास होईल व आता मराठी माणसांची जबाबदारी कशी वाढली, यावर विचार व्यक्त केले.

प्रश्न : मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर फायदा काय होईल?

    जगभर २0 हजार भाषा आहेत. त्यापैकी काही भाषा प्रतिष्ठित असून, त्यांचा जगभरात मान आहे. आता मराठी भाषेलाही जगभर मान-सन्मान मिळणार असून, त्या भाषांच्या बरोबरीने मराठीला गणले जाईल. जगभरातील नागरिकांचा या भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तसेच मराठीची प्रतिष्ठा उंचावेल व जगभर मराठीची पताका उभारली जाईल. सध्या मराठी महाराष्ट्राबाहेर १५ विद्यापीठांमध्ये शिकविल्या जाते. हा दर्जा मिळाल्यावर भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मराठी शिकविण्यासाठी अनुदान दिले जाईल.

प्रश्न: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सुरुवात केव्हा झाली व प्रवास कसा झाला?

२00४ साली तमीळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याचवेळी मराठीलाही हा दर्जा मिळावा, अशी इच्छा रंगनाथ पठारे व मराठीप्रेमी साहित्यिकांनी व्यक्त केली. त्यानंतर ४ वर्षांपूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर अनेक पुरावे गोळा करून सप्टेंबर २0१३ मध्ये केंद्र शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला. ५ फेब्रुवारी २0१५ रोजी केंद्रात असलेल्या तज्ज्ञांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस केली. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

प्रश्न : कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोणते निकष असतात?

याकरिता चार निकष असतात. १) ती भाषा दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीची असावी. २) भाषेची स्वत:ची स्वतंत्र परंपरा असावी, ती भाषा उसणी घेतलेली नसावी. तसेच भाषा व वाड्मय स्वयंभू असावे. ३) भाषेचे आत्ताचे रूप आणि प्राचीन रूप यामध्ये अंतर असू शकते, मात्र गाभा एकच असावा. ४) त्या भाषेचे साहित्यातील श्रेष्ठत्व असावे. या चार अटी आहेत.

प्रश्न : अभिजात दर्जामुळे नवी पिढी, तरुणांना काय मिळेल ?

      केंद्रात अन्य भाषांसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद असते तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे ५00 कोटी रुपये मिळणार आहेत. नव्या पिढीसाठी संशोधन प्रकल्प राबविल्या जाईल. मराठी ही ५२ बोली भाषा मिळून बनलेली आहे. या भाषांमधील लोकसाहित्य, म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन व संवर्धन करण्यासाठी अनुदान दिले जाईल. तरुण या भाषेचा विस्तृत अभ्यास करू शकतील.

प्रश्न: अभिजात दर्जा मिळाल्यावर मराठी माणसाची जबाबदारी काय आहे?

      मराठी माणसांची जबाबदारी वाढली आहे. मराठीबाबत दोन गैरसमज आहेत. त्यापैकी एक म्हणजे मराठी ही ८00 वषार्ंपूर्वीची भाषा आहे. त्यामुळे आता मराठी ८00 नव्हे तर अडीच हजार वर्षांपूर्वीची आहे, असे ठासून सांगायला हवे. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आलेली भाषा असल्याची चुकीची माहिती दिल्या जाते, तर मराठी ही संस्कृत भाषेच्या पूर्वीही होती व ती संस्कृतची मुलगी नसून मावशी आहे. संत नामदेव म्हणतात- संस्कृतवाणी देवे केली, मग पाकृत काय चोरापासून झाली.