शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

“सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच पाहतो”; मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 15:04 IST

Manoj Jarange Patil News: राज्यभरातील ८०० इच्छुक उमेदवारांनी भेट घेतली आहे. सर्वाधिक अर्ज पश्चिम महाराष्ट्रातून आलेत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. तसेच या विधानसभेत आमदार पाडणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जात आहे. शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील ५ सप्टेंबरपासून विधानसभा निहाय बैठका घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठा आंदोलनाचा विषय असला तरी शेतकऱ्यांचे विषयही महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा आहे. यासाठी आता मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच पाहतो

शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत. शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवत आहे. सरकार कर्जमाफी कशी करत नाही, ते पाहतो, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलनासोबत शेतकरी कर्जमाफीसाठी मनोज जरांगे पाटील कसे आंदोलन उभारणार, सरकार दरबारी त्याची कशी दखल घेतली जाणार, हे आंदोलन कसे असणार, याबाबत निश्चितता नसली तरी मनोज जरांगेच्या या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागणार असल्याचे सांगितले जात आहे. 

महाराष्ट्रातील ८०० इच्छुक उमेदवारांनी भेट घेतली

महाराष्ट्रातील ७०० ते ८०० इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. उमेदवार पाहिले की वाटते कुठून या लफड्यात पडलो. भरपूर उमेदवार आहेत. आम्हाला वाटत होते की, मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील, पण सर्वात जास्त अर्ज पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत. त्यानंतर नंबर २ ला मराठवाड्यातून अर्ज आले. आम्ही त्यासाठी लोक बसवलेत. मला त्यातील जास्त काही जमत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

दरम्यान, निवडणुका आल्या की साड्या वाटतात, आताही यांचे तसेच सुरु झाले आहे. सगळे मुद्दे आम्ही ताकतीने लावून धरणार आहोत. त्यासाठी, ५ सप्टेंबर पासून विधानसभा मतदारसंघ निहाय घोंगडी बैठका होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलFarmerशेतकरी