शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

“सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच पाहतो”; मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 15:04 IST

Manoj Jarange Patil News: राज्यभरातील ८०० इच्छुक उमेदवारांनी भेट घेतली आहे. सर्वाधिक अर्ज पश्चिम महाराष्ट्रातून आलेत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. तसेच या विधानसभेत आमदार पाडणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जात आहे. शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील ५ सप्टेंबरपासून विधानसभा निहाय बैठका घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठा आंदोलनाचा विषय असला तरी शेतकऱ्यांचे विषयही महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा आहे. यासाठी आता मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच पाहतो

शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत. शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवत आहे. सरकार कर्जमाफी कशी करत नाही, ते पाहतो, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलनासोबत शेतकरी कर्जमाफीसाठी मनोज जरांगे पाटील कसे आंदोलन उभारणार, सरकार दरबारी त्याची कशी दखल घेतली जाणार, हे आंदोलन कसे असणार, याबाबत निश्चितता नसली तरी मनोज जरांगेच्या या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागणार असल्याचे सांगितले जात आहे. 

महाराष्ट्रातील ८०० इच्छुक उमेदवारांनी भेट घेतली

महाराष्ट्रातील ७०० ते ८०० इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. उमेदवार पाहिले की वाटते कुठून या लफड्यात पडलो. भरपूर उमेदवार आहेत. आम्हाला वाटत होते की, मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील, पण सर्वात जास्त अर्ज पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत. त्यानंतर नंबर २ ला मराठवाड्यातून अर्ज आले. आम्ही त्यासाठी लोक बसवलेत. मला त्यातील जास्त काही जमत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

दरम्यान, निवडणुका आल्या की साड्या वाटतात, आताही यांचे तसेच सुरु झाले आहे. सगळे मुद्दे आम्ही ताकतीने लावून धरणार आहोत. त्यासाठी, ५ सप्टेंबर पासून विधानसभा मतदारसंघ निहाय घोंगडी बैठका होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलFarmerशेतकरी