शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आता सर्व हिंदू माझा बंधू! मोहन भागवतांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:33 IST

भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक

- शौकत शेखडहाणू  - भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिली.विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी प्रकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त रविवार, १५ एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन डहाणूतील आसवे येथे दुपारी करण्यात आले होते. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंदन जिंदाल, पालघर जिल्हा अध्यक्ष राजकुमार नागशेट हे या वेळी उपस्थित होते. या वेळी सवितानंदजी महाराज, तुंगारेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद महाराज, त्र्यंबकेश्वरचे रघुनाथ महाराज, प्रशांत हरतलकर, अशोक चौगुले यांचे स्वागत आदिवासी पेंटिंग व पुष्प देऊन करण्यात आले.सरसंघचालकांच्या हस्ते आदिवासींच्या हिरवादेवाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला प्रारंभ झाला. मार्गदर्शन करताना सरसंघचालक म्हणाले की, हिंदूंना संमेलन भरवून सांगावे लागते, ही चांगली गोष्ट नाही. आपण हिंदू आहोत, आपण कुणालाही परके मानत नसून, द्वेष करत नाही. जागतिक कल्याणासाठी हिंदू हे जंक्शन आहे. स्वार्थाकरिता काहीजण हिंदूंमध्ये भेद करत आहेत. रामसेतू तुटला, तर काय फरक पडतो, राममंदिराची गरज काय? हे मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.‘वनजन गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी भागवत यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर, मोखाडा येथील वैदू भगत ज्ञानाला सार्वजनिक रूप देणारे नवसुदादा वळवी, चित्रांमधून हिंदुत्व टिकविणारे तलासरीचे हरेश्वर वनगा, वयम संस्थेचे कार्यकर्ते विनायक थाळकर यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.देशासाठी वेळ द्याआदिवासी कधीच कोणालाही शरण गेलेला नाही. सनातन वैदिक संस्कृती व धर्म जपण्याचे कार्य या समाजाने केले आहे. जगाची नाडी, भारताकडे आहे. आपल्या देशासाठी वेळ द्या. बुद्धी, शरीर आणि कुटुंबाचा संसार नीट ठेवल्यास देश सुरिक्षत राहील. जातपात, भाषाप्रांत न मानता ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी सवय लावा, असे भागवत म्हणाले. सामाजिक सेवा करा, असे आवाहन करताना ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाºयाने घेत जावे’, या विंदांच्या कवितेचा दाखला त्यांनी दिला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtraमहाराष्ट्र