शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आता सर्व हिंदू माझा बंधू! मोहन भागवतांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:33 IST

भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक

- शौकत शेखडहाणू  - भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिली.विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी प्रकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त रविवार, १५ एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन डहाणूतील आसवे येथे दुपारी करण्यात आले होते. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंदन जिंदाल, पालघर जिल्हा अध्यक्ष राजकुमार नागशेट हे या वेळी उपस्थित होते. या वेळी सवितानंदजी महाराज, तुंगारेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद महाराज, त्र्यंबकेश्वरचे रघुनाथ महाराज, प्रशांत हरतलकर, अशोक चौगुले यांचे स्वागत आदिवासी पेंटिंग व पुष्प देऊन करण्यात आले.सरसंघचालकांच्या हस्ते आदिवासींच्या हिरवादेवाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला प्रारंभ झाला. मार्गदर्शन करताना सरसंघचालक म्हणाले की, हिंदूंना संमेलन भरवून सांगावे लागते, ही चांगली गोष्ट नाही. आपण हिंदू आहोत, आपण कुणालाही परके मानत नसून, द्वेष करत नाही. जागतिक कल्याणासाठी हिंदू हे जंक्शन आहे. स्वार्थाकरिता काहीजण हिंदूंमध्ये भेद करत आहेत. रामसेतू तुटला, तर काय फरक पडतो, राममंदिराची गरज काय? हे मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.‘वनजन गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी भागवत यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर, मोखाडा येथील वैदू भगत ज्ञानाला सार्वजनिक रूप देणारे नवसुदादा वळवी, चित्रांमधून हिंदुत्व टिकविणारे तलासरीचे हरेश्वर वनगा, वयम संस्थेचे कार्यकर्ते विनायक थाळकर यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.देशासाठी वेळ द्याआदिवासी कधीच कोणालाही शरण गेलेला नाही. सनातन वैदिक संस्कृती व धर्म जपण्याचे कार्य या समाजाने केले आहे. जगाची नाडी, भारताकडे आहे. आपल्या देशासाठी वेळ द्या. बुद्धी, शरीर आणि कुटुंबाचा संसार नीट ठेवल्यास देश सुरिक्षत राहील. जातपात, भाषाप्रांत न मानता ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी सवय लावा, असे भागवत म्हणाले. सामाजिक सेवा करा, असे आवाहन करताना ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाºयाने घेत जावे’, या विंदांच्या कवितेचा दाखला त्यांनी दिला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtraमहाराष्ट्र