शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

आता सर्व हिंदू माझा बंधू! मोहन भागवतांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:33 IST

भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक

- शौकत शेखडहाणू  - भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिली.विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी प्रकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त रविवार, १५ एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन डहाणूतील आसवे येथे दुपारी करण्यात आले होते. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंदन जिंदाल, पालघर जिल्हा अध्यक्ष राजकुमार नागशेट हे या वेळी उपस्थित होते. या वेळी सवितानंदजी महाराज, तुंगारेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद महाराज, त्र्यंबकेश्वरचे रघुनाथ महाराज, प्रशांत हरतलकर, अशोक चौगुले यांचे स्वागत आदिवासी पेंटिंग व पुष्प देऊन करण्यात आले.सरसंघचालकांच्या हस्ते आदिवासींच्या हिरवादेवाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला प्रारंभ झाला. मार्गदर्शन करताना सरसंघचालक म्हणाले की, हिंदूंना संमेलन भरवून सांगावे लागते, ही चांगली गोष्ट नाही. आपण हिंदू आहोत, आपण कुणालाही परके मानत नसून, द्वेष करत नाही. जागतिक कल्याणासाठी हिंदू हे जंक्शन आहे. स्वार्थाकरिता काहीजण हिंदूंमध्ये भेद करत आहेत. रामसेतू तुटला, तर काय फरक पडतो, राममंदिराची गरज काय? हे मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.‘वनजन गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी भागवत यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर, मोखाडा येथील वैदू भगत ज्ञानाला सार्वजनिक रूप देणारे नवसुदादा वळवी, चित्रांमधून हिंदुत्व टिकविणारे तलासरीचे हरेश्वर वनगा, वयम संस्थेचे कार्यकर्ते विनायक थाळकर यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.देशासाठी वेळ द्याआदिवासी कधीच कोणालाही शरण गेलेला नाही. सनातन वैदिक संस्कृती व धर्म जपण्याचे कार्य या समाजाने केले आहे. जगाची नाडी, भारताकडे आहे. आपल्या देशासाठी वेळ द्या. बुद्धी, शरीर आणि कुटुंबाचा संसार नीट ठेवल्यास देश सुरिक्षत राहील. जातपात, भाषाप्रांत न मानता ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी सवय लावा, असे भागवत म्हणाले. सामाजिक सेवा करा, असे आवाहन करताना ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाºयाने घेत जावे’, या विंदांच्या कवितेचा दाखला त्यांनी दिला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtraमहाराष्ट्र