शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना सव्वाशे कोटी रुपये वसुलीच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 06:17 IST

कारवाई अटळ : पुन्हा नव्या संस्था स्थापण्याचा घाट

समीर देशपांडे कोल्हापूर : शासनाचे कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल घेऊन उद्योग न उभारणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सुमारे १२५ कोटी रुपयांच्या वसुलीच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांची वसुली लागली असताना पुन्हा नव्याने या संस्था स्थापण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये अनेक मागासवर्गीय औद्योगिक संस्था उभारण्यासाठी राजकीय दबाव वापरून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या आहेत. त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. मात्र अनेकांनी केवळ या संस्थांच्या नावावर आपली घरे भरण्याचा उद्योग केला आहे.

राज्याच्या लोकलेखा समितीने याबाबत शासनाचे वाभाडे काढल्यानंतर या संस्थांच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली. मात्र तीही मधल्या काळात थंडावली. अनेकांना अंधारात ठेवून, त्यांच्या मागासवर्गीय असल्याच्या दाखल्याचा उपयोग करून, भाग भांडवल मंजूर करून घेऊन जमीनसुद्धा खरेदी न करता कोट्यवधी रुपये उचलल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर याबाबत चौकशीला सुरुवात होऊन अनेक संस्थांच्या पदाधिकाºयांवर गुन्हे दाखल झाले. आता त्याहीपुढे जाऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या संस्थांच्या मालमत्तेवर शासनाचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सर्व संस्था आणि पदाधिकाºयांच्या मालमत्ता गोठवून त्यावर हा कर्जाचा बोजा चढविण्यासाठी त्या-त्या तहसीलदारांकडे सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र या सर्वांची मालमत्ता कुठे आहे याची तुम्हीच माहिती द्या, अशी मागणी महसूल खात्याकडून होत आहे.

सरकारच्याही हातातून निसटला बाणमागासवर्गीयांमध्ये नाराजी नको म्हणून शासनही याबाबतीत सावकाश कारवाई करीत होते. परंतु याबाबत न्यायालयातच याचिका दाखल होऊन आदेश झाल्याने सरकारच्याही हातातून बाण निसटला आहे. परिणामी, ही कारवाई अटळ मानली जात आहे.

राज्यातून नवे ४४९ प्रस्ताव४२ मागासवर्गीय संस्थांची ओरड सुरू असताना आता पुन्हा ४४९ नवीन संस्था स्थापन करण्यासाठी राज्यभरातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यातील एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून ९२ प्रस्ताव असून, यासाठी मात्र सामाजिक न्याय विभागाने कडक भूमिका स्वीकारली आहे.