शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

चार प्रतिष्ठानांना बजावली एलबीटी वसुलीची नोटीस

By admin | Updated: May 7, 2015 00:09 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने धाडसत्र राबविण्यास प्रारंभ केला आहे.

कोल्हापूर : केंद्रात, राज्यात सत्तांतर झाले. आता सत्तांतराची ही संधी कोल्हापूर महानगरपालिकेतही आली आहे. या संधीचे सोनं करूया. कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख करूया, असा निर्धार बुधवारी कोल्हापुरात झालेल्या ‘मिशन महापालिका’ मेळाव्यात करत शिवसेनेने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा नारळ फोडला. अंतर्गत गटबाजी दूर करून शिवसेनेच्या वटवृक्षाला नीट आकार देण्यात येईल, असे स्पष्ट क रत मेळाव्यात सर्वच नेत्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसैनिकांना प्रोत्साहित केले. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या मेळाव्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात १९६६ पासून शिवसेनेत सैनिक म्हणून काम करत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या सुमारे ४०० शिवसैनिकांचा शाल, फेटा व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. भ्रष्टाचारमुक्त महापालिका आणि विकासाच्या दिशेने जाणारे शहर असा नावलौकीक मिळवून देण्याची संधी आहे. रवींद्र वायकर आणि अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनेला नक्की यश मिळेल. पक्षात शिवसैनिक हा पाया असून, त्यांनीच पक्षाची बांधणी केली आहे. काहींना वाटत होते आम्ही म्हणजेच शिवसेना आहे, पण असे म्हणणाऱ्यांची काय अवस्था होते, ते वांद्र्याच्या निवडणुकीत पाहायला मिळाले.’शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना शिवसैनिकांनी पार धुळीस मिळविले. शिवसैनिक जशी सत्ता मिळवून देतात, तसेच ते पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा बंदोबस्तही करतात, असे शिंदे म्हणाले. निवडणुका आल्या की राजकीय पक्षांची दुकाने सुरू होतात; पण शिवसेना हा असा पक्ष आहे की त्याचे काम बारा महिने सुरू असते. जनतेला मदतीचा हात दिला जात असतो. कोल्हापुरातही शिवसेना कायम जनतेला न्याय मिळवून देण्यात आघाडीवर आहे, म्हणूनच येथील महानगरपालिकेवर यावेळी भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराचा विकास ज्या पद्धतीने व ज्या गतीने व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. इतकी वर्षे सत्ता दिली; पण यांनी कोल्हापूरच्या जनतेला दिले काय? असा सवाल मंत्री रवींद्र वायकर यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या आडवे कोणीही आले तरी त्याच्याशी आपणाला सरळ भिडायचे आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजपवर किती विश्वास आहे, याची आपल्याला कल्पना नसली तरी शिवसेनेवर जनतेचा विश्वास आहे, असे वायकर म्हणाले. महानगरपालिकेवर सत्ता मिळविणे हे आपले स्वप्न असून, त्यासाठी गेली दहा वर्षे आपण सतत जनतेसोबत राहिल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. गेल्या २९ वर्षांतील शिवसेनेच्या वाटचालीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार सुजित मिणचेकर, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, शिवाजीराव जाधव यांची यावेळी भाषणे झाली. प्रा. विजय कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)फांद्या छाटा... नको, वटवृक्ष मरेलशिवसेनेतील गटबाजी हा ऐरणीवरील विषय असून, त्याचे पडसाद बुधवारच्या समारंभातही उमटले. जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा गट या समारंभापासून अलिप्त होता. याचा संदर्भ जोडत अरुण दुधवडकर यांनी, शिवसेनेच्या वृक्षाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले असले तरी त्यांच्या फांद्या इकडे तिकडे विखुरलेल्या असल्याने त्या छाटून टाकण्याची आवश्यकता बोलून दाखविली. जर वेळीच फांद्या (गटबाजी) छाटल्या, तर येत्या निवडणुकीत शिवसेनेला ५० जागा मिळतील, असेही ते म्हणाले; पण फांद्या विखुरल्या म्हणून त्या छाटणे हे पटणारे नाही, त्यामुळे वटवृक्ष मरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला योग्य आकार देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नव्याने बांधणी करूया, असे रवींद्र वायकर यांनी सांगितले.भाजपला आव्हान शहर विधानसभा मतदारसंघातील ५७ प्रभागांत ४३ ठिकाणी शिवसेनेने, तर भाजपने ७ ठिकाणी आघाडी घेतली आहे. असे असताना मित्रपक्षाचे नेते काय बोलतात हेच कळत नाही. त्यांना एकटे लढायचे असेल तर जरूर लढावे, शिवसेना त्याला घाबरणार नाही, असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी भाजपला दिला.