शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वंदे मातरम् बोलण्यास नकार देण्यात काहीच गैर नाही - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 13:05 IST

जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच गैर नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलले आहेत

ठळक मुद्दे'जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच गैर नाही''समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने 'वंदे मातरम्'चा मुद्या जाणुनबुजून उपस्थित केला जात आहे'अबू आझमी यांनी वंदे मातरम् बोलण्यास नकार दिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत वाद निर्माण झाला होता

कल्याण, दि. 1 - जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच गैर नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलले आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने 'वंदे मातरम्'चा मुद्या जाणुनबुजून उपस्थित केला जात असल्याचा आरोपही यावेळी रामदास आठवले यांनी केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

'प्रत्येकाने वंदे मातरम् बोललं पाहिजे, पण जर एखादी व्यक्ती नाही बोलली तर त्यात चुकीचं काय ?', असा प्रश्न रामदास आठवले यांनी यावेळी उपस्थित केला. 'कोणी वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही', असं मत रामदास आठवले यांनी मांडलं. 

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेत वंदे मातरम् म्हणण्यावरून वाद निर्माण झाला होता. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले होते. त्यानंतर राज्याच्या विधानसभेत ‘वंदे मातरम्’चा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. 

वंदे मातरम् या गीतावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली होती. 'वंदे मातरम् हे गीत म्हणणं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीशी निगडित आहे. जे लोक वंदे मातरम् हे राष्ट्रगीत गात नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही. मात्र वंदे मातरम् या गीताला विरोध करणं हेसुद्धा चुकीचेच आहे', असं नक्वी बोलले होते. 

केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री नक्वी बोलले होते की, 'राष्ट्रगीत म्हणणं एका व्यक्तीच्या आवडीशी संबंधित आहे, मात्र वंदे मातरमला विरोध करणं ही देशभक्ती ठरू शकत नाही. जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् गात नसल्यास ती व्यक्ती देशद्रोही किंवा राष्ट्रविरोधी असल्याचं ठरवू शकत नाही. वंदे मातरम् हे गीत गाणं हे व्यक्तीच्या स्वातंत्र्येचा एक भाग आहे. पण तरीही एखादी व्यक्ती जाणूनबुजून वंदे मातरमला विरोध करत असल्यास ती त्या व्यक्तीची मानसिकता दर्शवते'. 

काय झालं होतं विधानसभेत- औचित्याच्या मुद्द्यावर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या देशात राहून वंदे मातरम गायला विरोध केला जातोय. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल असं गोटे बोलले होते. यावर आझमींनी उत्तर देण्याची परवानगी मागितली होती. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. अबू आझमी वेलमध्ये उतरले. दोन्ही बाजूंनी  आमदारांच्या घोषणा सुरू होत्या.  

यानंतर आझमी यांनी इतिहासाचा दाखला दिला होता, 'देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं,  या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणी लिहिले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानाच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते ? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते ? त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही', असं आझमी बोलले होते.

यानंतर एकनाथ खडसेंनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला होता. 'देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे.  तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला,मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलेच पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे ? असं म्हणत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहना होगा', असं ठणकावलं होतं. 

दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयाने सर्व सरकारी शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये मध्ये वंदे मातरम बोलणं सक्तीचं केलं आहे. आठवड्यातून एकदा तरी वंदे मातरम बोलणं सक्तीचं करण्यात आलं आहे.