शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा 

By विजय दर्डा | Updated: February 24, 2025 10:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप हा समारोप ...

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप हा समारोप नसून मराठी भाषा संवर्धन करण्याची सुरुवात असल्याचे मत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी समारंभात व्यक्त केले. मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी भाषेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सरकारने तातडीने पाउले उचलण्याची गरज आहे. मराठी माणूस पराक्रमी आणि कर्तबगार आहे. महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे. त्यामुळे मराठी माणसाने महाराष्ट्र धर्म जपणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

लोकमत वृत्तपत्राचे तीन कोटी वाचक आहेत. लोकमत दिल्लीतूनही प्रकाशित होतो आहे. यास वाचकांचा पाठिंबा मिळत असल्याचा आनंद आहे. याचा अर्थ लोक मराठी वाचतात. मात्र, पुढच्या पिढ्यांनी मराठी बोलावी आणि त्यांचे मराठीशी नाते घट्ट व्हावे यासाठी आपण काय करीत आहोत? हा खरा मुद्या आहे. ३६ जिल्ह्यांच्या महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत ललित साहित्याचे एकही दुकान असू नये? विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यात पुस्तकाचे एकही दुकान नाही. ग्रंथालये आधीच कमी आहेत. असतील तर अनुदान कमी आहे. ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. मग वाचन संस्कृती कशी वाढणार? याकडे डॉ. दर्डा यांनी लक्ष वेधले.

आतापर्यंत तीन, चार महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे याचे उत्तर देवू शकतील, असे डॉ. दर्डा यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मराठी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळत नाही शाळा आणि भाषा या दोन्ही गोष्टी शिंदे साहेबांकडे आहेत आणि पैसे द्यायला अजितदादा तयार आहेत. यासाठी शासनाने आणखी काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळत नाही. याउलट इंग्रजी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळते? असा मुद्दा डॉ. दर्डा यांनी उपस्थित करताच सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला.

हे संमेलन ऐतिहासिकपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम या संमेलनाला केले आहे. यामुळे मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक आहे. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. यासाठी संजय नहार यांचे कौतुक करायला हवे. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ