शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

महाविकास आघाडीवेळी राज्याला ठेंगा; महायुतीला मात्र भरभरून निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 06:16 IST

केंद्र सरकारने ग्रामसडक योजनेचा निधी दोन वर्षे दिलाच नाही

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत २०२०-२१ आणि २०२१-२२ या कालावधीत केंद्र सरकारकडून एक पैसाही न मिळालेले कदाचित महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे. या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार येताच २०२२-२३ मध्ये केंद्र सरकारने ७४३ कोटींचा निधी मंजूर केला.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २००० मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. अवघ्या काही वर्षात तिची लोकप्रियता व उपयोगिता वाढली होती. योजनेतील कामगिरी आणि राज्याच्या वाटाचा खर्च केलेला निधी, यानुसार या योजनेत निधी वितरित केला जातो. केंद्र सरकारने देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना २०२०-२१ एकूण १३,६५१ कोटी रुपये आणि २०२१-२२ मध्ये १३,९५२ कोटी रुपये मंजूर केले. मात्र महाराष्ट्राला एकही रुपया मिळाला नाही. २०२३-२४ या वर्षाच्या जुलैपर्यंत २७६ कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला. 

...तरीही राज्यात २७ हजार किलोमीटरची कामेनिधीच्या अनुपलब्धतेमुळे महाराष्ट्राला ग्रामीण भागात रस्ते बांधण्यात अडचण आली नाही. राज्यांत २७,००० किलोमीटरचे ग्रामीण रस्ते पूर्ण झाले. राजकीय विरोधक राज्य सरकारचे नेतृत्व करीत असल्यामुळे महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. २०२२-२३ मध्ये स्थितीत कमालीची सुधारणा झाली आणि केंद्र सरकारने ७४३ कोटी रुपये दिले.

काही राज्यांनाही निधी नाहीnसंबंधित दोन वर्षांमध्ये या योजनेत आसाम, जम्मू- काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरला सर्वाधिक निधी मिळाला.n२०२०-२१ मध्ये काही राज्यांना केंद्रीय निधी मिळाला नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत; परंतु त्यांना २०२१-२२ मध्ये पुरेशी भरपाई देण्यात आली.nहरयाणाला २०२०-२१ मध्ये एकही पैसा मिळाला नव्हता. मात्र, त्याच्या पुढील वर्षी ३५३ कोटी रुपये दिले.

कोणतेही राजकारण नाहीप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून निधी वितरीत करताना त्यामागे काही राजकीय डावपेच असल्याचा इन्कारही करण्यात आल्याचे सूत्रांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राप्रमाणे मागील दोन वर्षे हरयाणा, तेलंगणाला या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला नव्हता. मात्र पुढील वर्षात नव्याने निधी मिळाला. पुढील २०२३-२४ वर्षांत जुलैपर्यंत महाराष्ट्राला पावणे तीनशे कोटींची निधी वितरित केला आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी