शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

‘थकीत वसुलीची जबाबदारी संरक्षण शाखेची नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 05:03 IST

विविध सेलिब्रिटी व बिल्डरांना सुरक्षेच्या कारणास्तव, सशस्त्र संरक्षण पुरविणा-या मुंबई पोलीस दलातील संरक्षण शाखेकडे त्यांच्याकडील शुल्काच्या थकबाकी वसुलीची जबाबदारी नसल्याची कबुली उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली.

जमीर काझी मुंबई : विविध सेलिब्रिटी व बिल्डरांना सुरक्षेच्या कारणास्तव, सशस्त्र संरक्षण पुरविणा-या मुंबई पोलीस दलातील संरक्षण शाखेकडे त्यांच्याकडील शुल्काच्या थकबाकी वसुलीची जबाबदारी नसल्याची कबुली उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली. त्यांच्याकडून शुल्क वसुुली करण्यासाठी जिल्हाधिका-यांशी पत्रव्यवहार केला जातो. मात्र, त्याच्या पाठपुराव्यासाठी निर्धारित मुदत किंवा कसलीही नियमावली नसल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षणाच्या बदल्यातील ५ कोटी २१ लाख रुपयांचे शुल्क थकविणा-या ३२ जणांचे संरक्षण हटविण्यात आले आहे. त्यामध्ये सिनेकलाकार, उद्योगपती, बिल्डर व काही राजकारण्यांचा समावेश आहे.माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरातील विविध क्षेत्रांतील एकूण १३३ खासगी व्यक्तींना बंदोबस्त पुरविण्यात येत आहे. त्याशिवाय ३२ जणांकडे ३० सप्टेंबरपर्यंत तब्बल ५ कोटी २१ लाख २२ हजार ३२८ रुपये थकबाकी असल्याचे उघडकीस आले होते. त्यात काही राजकीय नेते, उद्योगपती, बिल्डर व कलाकारांचाही समावेश असल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यांची नावे व वसुलीबाबतचा तपशील न दिल्याने, प्रथम अपील दाखल करण्यात आले होते. त्याबाबत अपील अधिकारी व उपायुक्त विनायक देशमुख यांच्याकडे झालेल्या सुनावणीत त्यांनी सांगितले की, ‘सुरक्षेच्या कारणास्तव संबंधितांची माहिती देऊ शकत नाही.शुल्क वसुलीची जबाबदारी संरक्षण शाखेची नसून जिल्हाधिकाºयांवर असते. त्यासाठी कालमर्यादा, पत्रव्यवहार, स्मरण पत्रे पाठविण्यासाठी कालावधीबाबत कसलेही नियम नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता,’ अशी धक्कादायक कबुली देत, शुल्क थकविणाºयाला संरक्षण काढून घेण्याशिवाय अन्य कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.>पोलीस आयुक्तांकडून आलेल्या प्रस्तावानुसार संरक्षण विभागाकडून संबंधित खासगी व्यक्तींना संरक्षण पुरविले जाते. मात्र संरक्षणाचे शुल्क वसुलीची जबाबदारी आमची नाही. त्यांच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले जाते. मात्र त्यासाठीही निश्चित कालावधी, स्मरणपत्रे पाठविण्याबाबत काहीही नियम नाहीत.-विनायक देशमुख (पोलीस उपायुक्त, संरक्षण शाखा)>ंसंरक्षण शाखेच्या उपायुक्तांनी दिलेल्या कबुलीमुळे, शुल्क थकविणाºयांना ‘सेलिब्रिटी’कडील वसुलीसाठीचा पाठपुरावा हा अधिकाºयांच्या मर्जीवरच अवलंबून असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यासाठी पत्रे, स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय त्यांच्या सोयीनुसार घेतला जात आहे. मुंबई पोलिसांकडून १३३ खासगी व्यक्तींना सुरक्षा पुरविले जाते. त्यामध्ये १३ खासदार, ४७ आमदार व एका नगरसेवकाचा समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिस