शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

‘थकीत वसुलीची जबाबदारी संरक्षण शाखेची नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 05:03 IST

विविध सेलिब्रिटी व बिल्डरांना सुरक्षेच्या कारणास्तव, सशस्त्र संरक्षण पुरविणा-या मुंबई पोलीस दलातील संरक्षण शाखेकडे त्यांच्याकडील शुल्काच्या थकबाकी वसुलीची जबाबदारी नसल्याची कबुली उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली.

जमीर काझी मुंबई : विविध सेलिब्रिटी व बिल्डरांना सुरक्षेच्या कारणास्तव, सशस्त्र संरक्षण पुरविणा-या मुंबई पोलीस दलातील संरक्षण शाखेकडे त्यांच्याकडील शुल्काच्या थकबाकी वसुलीची जबाबदारी नसल्याची कबुली उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली. त्यांच्याकडून शुल्क वसुुली करण्यासाठी जिल्हाधिका-यांशी पत्रव्यवहार केला जातो. मात्र, त्याच्या पाठपुराव्यासाठी निर्धारित मुदत किंवा कसलीही नियमावली नसल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षणाच्या बदल्यातील ५ कोटी २१ लाख रुपयांचे शुल्क थकविणा-या ३२ जणांचे संरक्षण हटविण्यात आले आहे. त्यामध्ये सिनेकलाकार, उद्योगपती, बिल्डर व काही राजकारण्यांचा समावेश आहे.माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरातील विविध क्षेत्रांतील एकूण १३३ खासगी व्यक्तींना बंदोबस्त पुरविण्यात येत आहे. त्याशिवाय ३२ जणांकडे ३० सप्टेंबरपर्यंत तब्बल ५ कोटी २१ लाख २२ हजार ३२८ रुपये थकबाकी असल्याचे उघडकीस आले होते. त्यात काही राजकीय नेते, उद्योगपती, बिल्डर व कलाकारांचाही समावेश असल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यांची नावे व वसुलीबाबतचा तपशील न दिल्याने, प्रथम अपील दाखल करण्यात आले होते. त्याबाबत अपील अधिकारी व उपायुक्त विनायक देशमुख यांच्याकडे झालेल्या सुनावणीत त्यांनी सांगितले की, ‘सुरक्षेच्या कारणास्तव संबंधितांची माहिती देऊ शकत नाही.शुल्क वसुलीची जबाबदारी संरक्षण शाखेची नसून जिल्हाधिकाºयांवर असते. त्यासाठी कालमर्यादा, पत्रव्यवहार, स्मरण पत्रे पाठविण्यासाठी कालावधीबाबत कसलेही नियम नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता,’ अशी धक्कादायक कबुली देत, शुल्क थकविणाºयाला संरक्षण काढून घेण्याशिवाय अन्य कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.>पोलीस आयुक्तांकडून आलेल्या प्रस्तावानुसार संरक्षण विभागाकडून संबंधित खासगी व्यक्तींना संरक्षण पुरविले जाते. मात्र संरक्षणाचे शुल्क वसुलीची जबाबदारी आमची नाही. त्यांच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले जाते. मात्र त्यासाठीही निश्चित कालावधी, स्मरणपत्रे पाठविण्याबाबत काहीही नियम नाहीत.-विनायक देशमुख (पोलीस उपायुक्त, संरक्षण शाखा)>ंसंरक्षण शाखेच्या उपायुक्तांनी दिलेल्या कबुलीमुळे, शुल्क थकविणाºयांना ‘सेलिब्रिटी’कडील वसुलीसाठीचा पाठपुरावा हा अधिकाºयांच्या मर्जीवरच अवलंबून असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यासाठी पत्रे, स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय त्यांच्या सोयीनुसार घेतला जात आहे. मुंबई पोलिसांकडून १३३ खासगी व्यक्तींना सुरक्षा पुरविले जाते. त्यामध्ये १३ खासदार, ४७ आमदार व एका नगरसेवकाचा समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिस