शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 19:51 IST

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना नाना पटोले यांनी परखड भाष्य केलं आहे.

Congress Nana Patole ( Marathi News ) : "शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. उद्धव ठाकरे हेदेखील आमच्यासाठी आदरणीय आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वच बाबतीत त्यांच्या हो ला हो म्हणू. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप हे मेरिटवरच व्हायला हवं," अशी रोखठोक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लोकमत व्हिडीओ'चे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत मांडली आहे.

"महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप तोडगा निघाला नसल्याचं दिसत आहे. जागावाटप काँग्रेसच्या मनासारखं होत आहे का?" असा प्रश्न मुलाखतीदरम्यान नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. त्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना पटोले यांनी म्हटलं की, "महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल आमची भूमिका अतिशय साधी आणि सरळ आहे. मेरिटच्या आधारावर जागावाटपाचा निर्णय व्हावा, असं आमचं मत आहे. जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला विकणारं सरकार सत्तेतून बाहेर काढता येईल. सत्ताधाऱ्यांचे चमत्कार फारच गंमतीशीर आहेत. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेले आणि आता तिथेही कर्ज करून आले. तिथल्या एका कंपनीने यांना नोटीस पाठवली असून कर्ज भरण्याची सूचना केली आहे. हे जिथं जातात तिथं कर्ज करून येतात. आता बुधवारी सरकारने निर्णय घेतला आणि ३० हजार कोटी रुपयांचा ओव्हरड्राफ्ट केला. म्हणजे आता सरकारला कर्मचाऱ्यांचे पगारही कर्जातून करावे लागणार आहेत. हे असं बिनकामी सरकार, शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही सरकार सत्तेतून बाहेर काढण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. त्यामुळे हे सरकार मुळासकट उखडून फेकण्यासाठी जागावाटप मेरिटच्या आधारे व्हावं, अशी आमची भूमिका आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

"लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीचा काँग्रेसलाही मोठा फायदा झाला आहे, त्यामुळे काँग्रेसने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना गृहित धरू नये, त्यांचा मान-सन्मान करावा, असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे, यावर काँग्रेसची भूमिका काय?" असाही प्रश्न 'लोकमत व्हिडीओ'च्या मुलाखतीदरम्यान नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. त्यावर नाना पटोले म्हणाले, "आम्ही मान-सन्मानच देत आहोत. ज्या भाजपने यांची घरं फोडली, यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचाच काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे भाजपला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर मेरिटवर निर्णय घ्यावा आणि या नेत्यांचा सन्मानही त्यातच आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. उद्धव ठाकरे हेदेखील आमच्यासाठी आदरणीय आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वच बाबतीत त्यांच्या हो ला हो म्हणू. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप हे मेरिटवरच व्हायला हवं."

दरम्यान, "विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांचं मतविभाजन होणार नाही, यासाठीचा प्लॅन आमच्या तीनही पक्षांकडे तयार आहे. जागावाटप झाल्यानंतर तो प्लॅन आम्ही जाहीर करू," अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४