शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

इतिहास असलेल्या किल्ल्यांना नखभरही धक्का लागू देणार नाही:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 20:13 IST

छत्रपतींचा, मराठ्यांचा इतिहास जिथे जिथे आहे. त्या किल्ल्यांना काहीही करण्याची परवानगी सरकार कधीच देणार नाही.

ठळक मुद्देपर्यटन मंत्रालयाकडून गड किल्ल्यांना भाडे तत्वावर देण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा

पुणे : राज्यातील इतिहास असलेल्या एकाही किल्ल्याला नखमयही धक्का लागू देणार नाही. हा जो पर्यटन मंत्रालयाचा निर्णय झाला तो ज्या किल्ल्यांना इतिहास नाही त्यांच्या संदर्भात आहे.  परंतु, या निर्णयाबाबत चुकीचे वृत्त पसरवले जात आहे ,  गड किल्ल्यांसंदर्भातील सरकारच्या निर्णयासंबधी उद्भवलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टोक्ती दिली. 

पर्यटन मंत्रालयाकडून गड किल्ल्यांना भाडे तत्वावर देण्याचा विचार सुरु असून तिथे समारंभांना देखील परवानगी दिली जाणार असल्याच्या चर्चेने राजकीय व सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले . विरोधकांनी देखील त्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यानंतर सरकारक़डून या निर्णयावर सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्र्याचा गणेश मंडळांच्या भेटीसाठीचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस यांनी गडकिल्ल्यांविषयीच्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले,  संभाजीराजांचे मी अभिनंदन करतो त्यांनी किल्ल्यांच्या संवर्धनाचे चांगले.काम केले आहे. मात्र, समाजात पर्यटन मंत्रालयाच्या निर्णयावर अफवा पसरविण्यात येत आहे. इतिहास असलेल्या कोणत्याही किल्ल्यांना काहीही धक्का लागणार नाही यावर आमचे लक्ष राहील.छत्रपतींचा, आमच्या मराठ्यांचा इतिहास जिथेजिथे आहे त्या किल्ल्यांना काहीही करण्याची परवानगी कधीच दिली जाणार नाही. जिथे फक्त चार भिंती राहिल्यात, कसला इतिहास.नाही तिथे पर्यटनाच्या दृष्टया काही करता येईल असा हा निर्णय आहे. तिथेही लग्न लावणार किंवा कार्यक्रम होणार असे नाही.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFortगडtourismपर्यटनShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPoliticsराजकारणJaykumar Rawalजयकुमार रावल