शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

महाविकास नव्हे; विसंवादी सरकार अंतर्विरोधातूनच पडेल, चंद्रकांत पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 06:34 IST

सरकारवर रिमोट आहे पण तो मुख्यमंत्र्यांचा नाही हे मी सांगण्याची गरज नाही.

मुंबई : तीन पक्षांच्या तीन भूमिका आणि त्यातून निर्माण झालेला विसंवाद हा या सरकारचा पाया आहे. हे सरकार पाच वर्षे काय टिकणार. ते पडण्यासाठी आपसातील अंतर्विरोध पुरेसे आहेत. मुख्यमंत्र्यांची १०० दिवसांतील काही खास कामगिरीच दिसत नसेल तर त्याचे मूल्यांकन काय करणार? आपल्या खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्रीही आपणच आहोत या अविर्भावात काही मंत्री काम करीत आहेत. सरकारवर रिमोट आहे पण तो मुख्यमंत्र्यांचा नाही हे मी सांगण्याची गरज नाही.महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेची अत्यंत वेगवान अंमलबजावणी होतेय, तरीही आपला विरोध का?गेल्या दोन वर्षात आधी दुष्काळ आणि मग अतिवृष्टीत लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यांना एका पैशाचीही मदत या कर्जमाफीने दिलेली नाही. पूरग्रस्तांना हेक्टरी २५ आणि ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची उद्धव ठाकरेंची आधीची भूमिका तेच विसरले.शेतकऱ्यांच्या नशिबी फसवी योजना आली.महाविकास आघाडी सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीकडे आपण कसे पाहता?नवीन काय करायचे या बाबत या सरकारमध्ये स्पष्टता नाही. चौकशी आणि स्थगितीचे ध्येय ठेऊन काम सुरू आहे. चौकशांना आम्ही घाबरत नाही पण आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या सरकारमधील निर्णयांच्या चौकशांच्या नावाखाली विकास कामांचा खोळंबा करू नका. चौकशी करायचीच ना तर कालबद्ध करा, पंधरा-वीस दिवसात चौकशी करा, दोषींवर कारवाई करा. लोकोपयोगी कामे रोखणारे हे स्थगिती सरकार आहे. स्थगिती देत असाल तर पर्यायही द्या, त्या पर्यायांचाही पत्ता नाही. कर्जमाफी आणली पण तीही फसवी. कुणाचाही सातबारा कोरा होणार नाही. नियमित कर्ज फेडणाºयांना प्रोत्साहन नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचे मूल्यांकन आपण कसे कराल?कामगिरीच नाही तर मूल्यांकन काय करणार?अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री अभावानेच विधानसभेत बसतात. महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रश्नांना त्यांना सामोरेच जायचे नाही. व्यक्ती म्हणून खूप चांगले पण राज्याच्या विकासाचा रोडमॅप हाती नसलेले मुख्यमंत्री आहेत.हे सरकार पाच वर्षे टिकेल असे शरद पवार, उद्धव ठाकरे म्हणताहेत, आपल्याला काय वाटतं?वस्तूस्थिती व समज हे वेगवेगळे असतात. वस्तूस्थिती ही आहे की तीन पक्षांमधील अंतर्विरोधातून,विसंवादातून हे सरकार पडेल. आम्ही सरकार पडण्याची वाट पाहतोय असं नाही, ते पाडण्याचे प्रयत्नही आम्ही करणार नाही पण आजच काँग्रेसकडून शिवसेनेची कोंडी केली जात असल्याचं दिसतंय. सरकारमध्ये राहणं काँग्रेसला फार काळ परवडणार नाही. सीएएचा मुद्दा, १०० युनिटपर्यंतची वीज माफी असे शिवसेनेची कोंडी करणारे विषय काँग्रेस रेटत राहील आणि मग जनतेच्या प्रश्नांवर सरकारमधून बाहेर पडत असल्याची भूमिका घेईल.आपल्या पक्षापेक्षा या सरकारमधील मंत्र्यांना निर्णयांचे स्वातंत्र्य अधिक आहे असे दिसते?आमच्या काळात निर्णय आणि अंमलबजावणीत सूसूत्रता होती. सरकारमध्ये एकवाक्यता होती. लोकाभिमुख निर्णयांबाबत मतैक्य होते. आज आपल्या खात्याशी संबंध नसलेल्या बाबींवर दुसराच मंत्री बोलतोय. मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण दिसत नाही. गोंधळ वाढविणारी गतिमानता काय कामाची?१०० दिवसात या सरकारचे काही घोटाळे आपल्या निदर्शनास आले आहेत का?नक्कीच! बरीचशी माहिती आमच्याकडे येतेय. आम्ही दुर्बीण लावून बसलो आहोत. आपण काहीही केले तरी चालते आणि आपल्याला कोणी बघत नाही या अविर्भावात काही मंत्री कारभार करताहेत. आमची यंत्रणा त्यावर लक्ष ठेवून आहे. योग्य वेळ येताच त्या बाबतची नक्कीच देऊ.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील