शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

नोटाबंदी, जीएसटीची रचना या घोडचुका : पी. चिदंबरम् --मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचे मांडले वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 20:35 IST

एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असताना ‘नोटाबंदी’ आणि चुकीची रचना करून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे पुन्हा एकदा ती दिशाहीन झाली आहे, असे रोखठोक मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘राष्ट्रीय अर्थव्यवस्था-सद्य:स्थिती व परिणाम’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषयसरकार केवळ कर गोळा करण्याच्या मागे विकासदर वाढत असताना नोटाबंदीचा मोठा चुकीचा निर्णय घेतल्याने पुन्हा त्यात घट

कोल्हापूर : एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असताना ‘नोटाबंदी’ आणि चुकीची रचना करून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे पुन्हा एकदा ती दिशाहीन झाली आहे, असे रोखठोक मत  माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी व्यक्त केले.

कोल्हापूरचेंबर्स आॅफ कॉमर्सने सोमवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘राष्ट्रीय अर्थव्यवस्था-सद्य:स्थिती व परिणाम’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

चिदंबरम् म्हणाले, नागरिकांची क्रयशक्ती, सरकारी धोरणे, निर्यात आणि खासगी गुंतवणूक यावर कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. मात्र, सरकार केवळ कर गोळा करण्याच्या मागे लागले आहे. नागरिकांची क्रयशक्ती घटली आहे. निर्यातीचा वेगही कमी झाला असून, खासगी गुंतवणुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे देशातील कोणताही घटक सध्या समाधानी नाही.

युपीए आणि एनडीएच्या कालावधीतील आर्थिक स्थितीची तुलनात्मक मांडणी करताना चिदंबरम् म्हणाले, युपीए १ वेळी ८.0५ टक्के हा विकास दर होता. युपीए २ वेळी तो ७.0५ टक्के होता. मात्र, एनडीएच्या काळात तो ६.0३ टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यानंतरही विकासदर वाढत असताना नोटाबंदीचा मोठा चुकीचा निर्णय घेतल्याने पुन्हा त्यात घट झाली. नोटाबंदीमुळे लहान आणि मध्यम उद्योजक देशोधडीला लागले. काळा पैसा अजूनही निर्माण होत आहे, भ्रष्टाचार कमी झाला नाही आणि दहशतवादी कृ त्ये तर आधीपेक्षा वाढली आहेत.

‘जीएसटी’ची मांडणी आम्ही केली तेव्हा आठ वर्षे भाजपने कडाडून विरोध करत या कराची अंमलबजावणी करू दिली नाही. मात्र, आपणच जीएसटीचे चॅम्पियन असल्याप्रमाणे त्यांनी सत्तेवर आल्यावर तो आमच्याच सहकार्याने मंजूर करून घेतला. मात्र, अतिशय चुकीच्या रचनेमुळे अपेक्षित फायदा होण्याऐवजी पुन्हा एकदा उद्योग, व्यापार क्षेत्राला उद्ध्वस्त करण्यासाठी हा कर कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. याच पद्धतीने बँकिंग क्षेत्रामध्ये अनागोंदी असून आज मोठे कर्ज घेण्यासाठी कुणी तयार होत नाही आणि घेतो म्हणाला तर बँका द्यायला तयार नाहीत. जाणीवपूर्वक बँका बुडविणारे बाहेर पळून गेलेत आणि शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आल्यामुळे कर्ज भरू न शकले त्यांच्यामागे मात्र ससेमिरा सुरू आहे.

चेंबर्स आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी स्वागत केले. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले, तर योगेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संजय शेटे यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, प्रदीप कापडिया यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.कोल्हापूर येथे चेंबर्स आॅफ कॉमर्सच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी सोमवारी आपले विचार मांडले. यावेळी प्रदीप कापडिया, चंद्रकांत जाधव, शरद रणपिसे, शोभा बोंद्रे, सतेज पाटील, ललित गांधी, संजय शेटे, प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते. 

 

टॅग्स :GSTजीएसटीEconomyअर्थव्यवस्था