शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

‘सुगी’वर नोटबंदी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 06:20 IST

एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बंद झाल्याने, ऐन सुगी हंगामात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट

योगेश बिडवई / मुंबई एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बंद झाल्याने, ऐन सुगी हंगामात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले आहे. शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने, ग्रामीण भागात अक्षरश: आर्थिक आणीबाणी उद्भवली आहे. खरिपाचे पीक बाजारात विक्रीसाठी आलेले असताना व रब्बी हंगामाची लगबग सुरू असताना, हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे. व्यापाऱ्यांनी कृषिमालाची खरेदी बंद केल्याने ग्रामीण चलनवलनच थांबले आहे. दमदार पावसामुळे राज्यात खरिपाचे जोमदार पीक आले आहे. शेतमाल विकून चार पैसे मिळण्याच्या आशेवर असलेले शेतकरी बहुतांश बाजार समित्या बंद असल्याने निराश आहेत. रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, मजुरीचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे रोकड शिल्लक नसल्याने स्थिती आणखी बिकट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव व लासलगाव बाजार समित्या वगळता, इतर ठिकाणी कांदाखरेदी सुरू होती. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांच्या हातात पुरेशी रोकड नसल्याने कांद्याला मोठी मागणी नाही. त्यामुळे व्यापारी कांद्याची खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. सरकारी कार्यालयांप्रमाणे कृषिमाल विकल्यानंतर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, म्हणजे घाऊक व्यवहार सुरळीत होतील, असे मत पिंपळगाव बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप बनकर यांनी व्यक्त केले.विदर्भ व मराठवाड्यात मका, कापूस, सोयाबीनची विक्री करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. काहींना उधारीवर तर काहींना चेकने माल विकावा लागत आहे. ही एकप्रकारची आर्थिक आणिबाणीच असल्याचे कृषी अर्थतज्ज्ञ रमेश पाध्ये यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने नोव्हेंबर हा महत्त्वाचा महिना असतो. खरिपाचे पीक बाजारात विकून रब्बीची तयारी सुरू होते. त्यासाठी चार पैसे त्याच्या हातात असणे गरजेचे असते. मात्र सरकारने पुरेशी काळजी न घेता शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता सुगीच्या दिवसांतच नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले आहे. देशात एका आठवड्यात कांद्याच्या मागणीत तब्बल ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे आम्ही जपून खरेदी करत आहोत, असे कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्षसोहनलाल भंडारी म्हणाले.