शहरं
Join us  
Trending Stories
1
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
2
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
3
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
4
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
5
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
6
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
7
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
8
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
9
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
10
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
11
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
12
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
13
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
14
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
15
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
16
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
17
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
18
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
19
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
20
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
Daily Top 2Weekly Top 5

‘सुगी’वर नोटबंदी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 06:20 IST

एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बंद झाल्याने, ऐन सुगी हंगामात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट

योगेश बिडवई / मुंबई एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बंद झाल्याने, ऐन सुगी हंगामात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले आहे. शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने, ग्रामीण भागात अक्षरश: आर्थिक आणीबाणी उद्भवली आहे. खरिपाचे पीक बाजारात विक्रीसाठी आलेले असताना व रब्बी हंगामाची लगबग सुरू असताना, हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे. व्यापाऱ्यांनी कृषिमालाची खरेदी बंद केल्याने ग्रामीण चलनवलनच थांबले आहे. दमदार पावसामुळे राज्यात खरिपाचे जोमदार पीक आले आहे. शेतमाल विकून चार पैसे मिळण्याच्या आशेवर असलेले शेतकरी बहुतांश बाजार समित्या बंद असल्याने निराश आहेत. रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, मजुरीचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे रोकड शिल्लक नसल्याने स्थिती आणखी बिकट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव व लासलगाव बाजार समित्या वगळता, इतर ठिकाणी कांदाखरेदी सुरू होती. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांच्या हातात पुरेशी रोकड नसल्याने कांद्याला मोठी मागणी नाही. त्यामुळे व्यापारी कांद्याची खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. सरकारी कार्यालयांप्रमाणे कृषिमाल विकल्यानंतर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, म्हणजे घाऊक व्यवहार सुरळीत होतील, असे मत पिंपळगाव बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप बनकर यांनी व्यक्त केले.विदर्भ व मराठवाड्यात मका, कापूस, सोयाबीनची विक्री करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. काहींना उधारीवर तर काहींना चेकने माल विकावा लागत आहे. ही एकप्रकारची आर्थिक आणिबाणीच असल्याचे कृषी अर्थतज्ज्ञ रमेश पाध्ये यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने नोव्हेंबर हा महत्त्वाचा महिना असतो. खरिपाचे पीक बाजारात विकून रब्बीची तयारी सुरू होते. त्यासाठी चार पैसे त्याच्या हातात असणे गरजेचे असते. मात्र सरकारने पुरेशी काळजी न घेता शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता सुगीच्या दिवसांतच नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले आहे. देशात एका आठवड्यात कांद्याच्या मागणीत तब्बल ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे आम्ही जपून खरेदी करत आहोत, असे कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्षसोहनलाल भंडारी म्हणाले.