शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

युतीच्या जागावाटपाबाबत सेनेला कोणताही शब्द दिलेला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 06:49 IST

जागा वाटपाबाबत अमित शहांची राज्यातील नेत्यांना सूचना

हरिश गुप्ता

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी नेमक्या किती किती जागा लढवायच्या आहेत, याचा कोणताही शब्द शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला गेलेला नाही. शिवसेनेबरोबरचे जागा वाटपाशी संबंधित मुद्दे निकाली काढा, असे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील भाजपला सांगितले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना व इतर पक्षांबरोबर जागा वाटपाची बोलणी किंवा वाटाघाटी तुम्ही करायची आहे, हे स्पष्टपणे कळवले आहे.

अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांची मुंबईत ‘मातोश्री’वर भेट घेतली होती व या भेटीत विधानसभा निवडणुकीबाबत कोणताही शब्द दिला नव्हता. तेव्हा झालेली बोलणी ही फक्त लोकसभेच्या किती जागा लढवायच्या एवढ्यापुरतीच मर्यादित होती. शिवसेनेने लोकसभेसाठी २३ जागा मागितल्या होत्या व त्या मान्यही झाल्या होत्या. ठाकरे यांना त्याचवेळी विधानसभा निवडणुकीसाठीही जागांची चर्चा करायची होती. परंतु, तशी काही चर्चा झाली नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणतेही मतभेद होऊ नयेत, असे भाजपला हवे होते. त्यामुळे शिवसेनेच्या सगळ््या मागण्या मान्य केल्या गेल्या. परंतु, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष श्रेष्ठींनी जागा वाटपाचा प्रश्न कसा सोडवायचा हे महाराष्ट्र भाजपकडे सोपवले असून स्वत: ठराविक अंतरावर राहायचे ठरवले आहे. भाजप श्रेष्ठींना जागा वाटपाच्या कामात गुंतायचे नाही म्हणून त्यांनी हा उपाय केला असून करार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अनुभवावर सोपवली आहे. भाजप-सेनेबरोबर देवाण-घेवाण करण्यास उत्सुक आहे. परंतु, जागा वाटप ५० : ५० असे नसेल. ते असेल ते गुणवत्ता आणि जिंकण्याची क्षमता या आधारावर, असे सूत्रांनी सांगितले व आता हे काम राज्य भाजपला करायचे आहे, असे त्यांनी म्हटले.

कठोर भूमिकेचे भाजपकडून संकेतपक्षश्रेष्ठींचा पवित्रा मित्रपक्षांच्या दबाबाला बळी न पडता ठाम भूमिका घेतली जाईल, असे संकेत देणारा आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत युतीतील मित्रपक्ष मागण्या करणार असेल तर स्वबळावर निवडणूक लढवण्यास भाजप तयार आहे. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना जागावाटपावर एकमत न झाल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस