शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनचे ‘नो टेन्शन’; ‘रिस्क’ सरकारकडे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 06:33 IST

मुंबई : पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना जाहीर केली. ...

मुंबई : पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना जाहीर केली. त्यानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूकविषयक जोखीम राज्य शासनाने स्वीकारली. त्यानुसार १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ६०% निवृत्तीवेतन, महागाई भत्ता मिळणार आहे.

विविध पेन्शन योजनेतील फरक? जुनी पेन्शन योजना - निवृत्तीवेतनाच्या खर्चाचा संपूर्ण भार राज्य सरकार उचलत होता. ही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जात नव्हती.

नवी पेन्शन योजना - कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा १०% कपात केली जात असे आणि त्यात राज्य सरकार १४% रक्कम टाकत होते. त्यानुसार दरमहा एकूण २४% रक्कम शेअर बाजारात गुंवतली जात होती. परंतु निवृत्तीवेळी बाजारातील तत्कालीन परिस्थितीनुसार कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जात होती. १ एप्रिल २०१५ पासून केंद्राप्रमाणे राज्यातही राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली. 

सुधारित पेन्शन योजना - नव्या पेन्शन योजनेप्रमाणेच पेन्शनची रक्कम दरमहा शेअर बाजारात गुंतवली जाईल. निवृत्तीवेळी शेवटच्या पगाराच्या ५० टक्के रक्कम व त्यावरील महागाई भत्ता अशी रक्कम पेन्शन स्वरूपात मिळेल. विशेष म्हणजे बाजारातील गुंतवणुकीची जोखीम सरकारने स्वीकारली.

अशी मिळेल सुधारित पेन्शन - राष्ट्रीय पेन्शन योजनेनुसार, कर्मचाऱ्यांनी हा विकल्प स्वीकारल्यास, सुधारित पेन्शन योजनेमध्येही १ नोव्हेंबर २००५ रोजी वा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के आणि राज्य सरकारकडून १४ टक्के रक्कम दरमहा शेअर बाजारात गुंतवली जाईल. 

- निवृत्तीपर्यंत बाजारात जमा झालेली रक्कम ही पेन्शन स्वरूपात देण्यासाठी शेवटच्या पगाराच्या ५० टक्के व त्यावेळचा महागाई भत्ता हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. नव्या पेन्शन योजनेत नसलेली बाजारातील जोखीम सुधारित पेन्शन योजनेत सरकारने स्वीकारली आहे. 

- नव्या पेन्शन योजनेच्या तुलनेत सुधारित योजनेत शेवटच्या पगाराच्या ५० टक्के रकमेची खात्री व बाजारातील जोखीम हा नव्या गोष्टी कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

‘त्या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाकेंद्राप्रमाणेच राज्यातील ८० वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना वाढीव निवृत्तीवेतन देण्याची मागणी पूर्ण करण्याची तसेच २००५ मध्ये भरतीची जाहिराती निघाल्या, पण भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनState Governmentराज्य सरकार