शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शोषित सत्तेवर आल्यानंतरही शोषितांचे दु:ख संपलेले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 21:48 IST

दलित, आदिवासी आज निर्भय आहेत का? शेतकरी सुखी आहे का? याचे उत्तर म्हणजे आजचे वर्तमान.

ठळक मुद्दे'' पिढीजात '' कादंबरीचे लेखक श्रीकांत देशमुख यांचे मतदोन महिन्यात खपल्या दोन आवृत्त्या

- राजू इनामदार- पुणे: Exploited सत्तेवर आले तर शोषितांचे दु:ख संपेल अशी महात्मा फुले, वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. स्वातंत्र्यानंतर आता इतक्या वर्षांनी प्रशासनात व काही प्रमाणात सत्तापदांवरही शोषित आले असूनही दुदेर्वाने तसे झालेले दिसत नाही. पिढीजात मधून वर्तमानाचे हेच वास्तव मांडण्याचा प्रयत्न आहे असे प्रसिद्ध लेखक श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. तब्बल ६०० पृष्ठांच्या, राज्याच्या सर्वच क्षेत्रातील वर्तमानाचा व्यापक धांडोळा घेणाऱ्या देशमुख यांच्या '' पिढीजात'' या कादंबरीचे वाचकांकडून चांगले स्वागत होत आहे. अल्पावधीतच तिची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. त्या पार्श्वभूमीवर ' लोकमत'  शी बोलताना देशमुख यांनी या कादंबरीतून वर्तमानाचे वास्तव मांडले असल्याचे स्पष्ट केले.   देशमुख स्वत: प्रशासानात एक वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेतील तसेच मराठी समाजातील अनिष्ट व्यवहार कांदबरीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले आहेत. सहकार निबंधक असलेल्या नवनाथ शेळके या कादंबरीच्या नायकाच्या नजरेतून व्यवस्थेमधील हीनपणाउलगडत जातो. सरकारी व्यवस्थेत काम करताना जे दिसले ते एका शेतकरी असलेल्या अधिकाºयाच्या नजरेतून टिपले असे देशमुख म्हणाले.  -पिढीजात लिहिण्याची प्रेरणा काय? मी खरा तर कवी, पण जे पहात होतो ते व्यक्त करण्यासाठी एक व्यापक पट हवा होता.  शेतकरीपणाचे दु:ख काय ते स्वत: शेतकरी असल्यामुळे भोगले होते. चळवळीत काम केल्याचा अनुभव होता. सरकारी अधिकारी झाल्यानंतर त्या दु:खाचे वेगवेगळे पदर लक्षात आले. व्यवस्थेचे आकलन, विश्लेषण करता आले. त्यानंतर पुर्वसुरींचा शोध घेण्याची आसच लागली. कादंबरीच्या माध्यमातून हवा असलेला पट मिळाला व ह्यपिढीजातह्ण आकाराला आली.-आजचे वर्तमान काय आहे?त्यासाठी थोडे मागे जायला हवे. महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व थोर माणसांची धारणा काय होती. शिक्षण घ्या, राज्यकर्ते व्हा, म्हणजे शोषण थांबेल असेच त्यांना वाटत होते. शिक्षणाला त्यांनी परिवर्तनाचे साधन मानले होते. आज इतक्या वर्षांनंतर जवळपास प्रत्येक क्षेत्रात बहुजन समाजातील अनेकजण आले आहेत. सरकारी सेवेत आहेत, राजकारणात आहेत. पण म्हणून शोषण संपले किंवा थांबले असे म्हणता येईल का हा कळीची मुद्दा आहे. दलित, आदिवासी आज निर्भय आहेत का? शेतकरी सुखी आहे का? याचे उत्तर म्हणजे आजचे वर्तमान. तेच कांदबरीमधून मांडले आहे.- पिढीजात मध्ये ते आहे, मात्र त्यावरचे उत्तर नाही. असे का?लेखक किंवा कोणताही कलावंत हा काही कार्यकर्ता नसतो. तो वास्तव मांडत असतो. एक अधिकारी, जो शेतकºयाचा मुलगा आहे तो या व्यवस्थेत शिरतो, मात्र तेथील हीन स्विकारत नाही. त्याचे शेतकरीपण तो अधिकारी झाला तरी विसरत नाही. भ्रष्ट होण्याच्या प्रत्येक प्रसंगाला तो धैयार्ने तोंड देतो,  मंत्री, आमदार, सामाजिक कार्यकर्ते यांना तो नेटाने तोंड देतो. अधिकारी म्हणून त्याच्यावर असलेल्या जबाबदारीपासून तो तोंड लपवत नाही. माज्यासाठी हेही महत्वाचे आहे. समाजात असे अनेकजण आहेत. संख्येने कमी आहेत, पण आहेत. पिढीजातचा नायक त्यांचे प्रतिनिधित्व करतो. भ्रष्टाचार होत आहे म्हणून त्याकडे तो डोळेझाक करत नाही, कारवाई करतो, त्यामुळे येणाºया सर्व प्रसंगांना तोंड देतो. माज्यामते याचे कारण तो आपण शेतकरी आहोत, आपले आईवडिल अल्पभूधारक शेतकरी आहेत हे तो विसरत नाही. कांदबरीत व्यवस्थेवरचे उत्तर आहे, मात्र ते अशा गोष्टींमध्ये दडलले आहे.- खात्याकडून नायकाचे निलंबन होते. हा नायकाचा पराभव नाही का?असे म्हणता येणार नाही. ह्यपिढीजातह्णचा नायक आशावादी आहे. तो व्यवस्था त्याच्या शक्तीप्रमाणे सुधारण्याचा प्रयत्न करतो. ज्यांचे नुकसान झाले आहे ते त्यांना परत मिळावे ही त्याची प्रामाणिक भावना आहे.  त्यासाठी झालेले निलंबन तो स्विकारतो. मातीत पहुडलेल्या त्याला देहाला अंकूर फुटत आहेत असे वाटते यात थोडा ललितरम्यपणा आहे, मात्र तो त्याचा आशावाद आहे. त्यातून काही सुचवले आहे. त्याची संवेदनशीलता माज्यासाठी महत्वाची आहे. त्यातून तो असा झाला. अनेकजण तसे असतात. त्यामुळे ते पराभूत झालेह्ण किंवा त्यांनी पराभव स्विकारला आहे असे म्हणणे योग्य नाही. -पिढीजात मध्ये ज्या वर्तमानाचे तुम्ही दर्शन घडवले आहे त्याकडे एक अधिकारी व लेखक म्हणून तुम्ही कसे पाहता? महत्मा गांधी म्हणत असत की प्रशासन यंत्रणा ही दमन यंत्रणा होता कामा नये. तिच्यात लोकसहभाग हवा. ती लोकांसाठीची व्यवस्था असायला हवी. ही यंत्रणा वर्चस्ववादी होते त्यावेळी वरवर दिसायला लोकशाही दिसत असते, मात्र वास्तव हे असते की यंत्रणा वर्चस्ववादी होऊन लोकशाहीला खात असते. मात्र व्यवस्थेतच नवनाथसारखे अनेकजण असतात. त्यामुळेच निराशावादी होण्याचे कारण नाही. आशावाद माणसाला जीवंत ठेवतो. मीही एक लेखक आणि अधिकारी म्हणूनही आशावादीच आहे.-------------------------------- 

टॅग्स :Puneपुणेinterviewमुलाखत