शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांवर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नको!

By admin | Updated: December 2, 2014 00:38 IST

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले काम करायची क्षमता आहे. जर त्यांच्यावर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नसला तर ते राज्याला देशाचा ‘हेडमास्टर’ बनवतील या शब्दांत

अण्णा हजारे : नरेंद्र मोदी यांनी जनतेची दिशाभूल केल्याची टीकानागपूर : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले काम करायची क्षमता आहे. जर त्यांच्यावर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नसला तर ते राज्याला देशाचा ‘हेडमास्टर’ बनवतील या शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावावर टीका केली. नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील हल्लाबोल केला. मोदी हे बोलतात खूप, परंतु कृतीमधून ते प्रत्यक्षात उतरत नाही. परदेशातील बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा १०० दिवसांत परत आणणे शक्य नाही हे मोदींना माहीत होते. परंतु तरीदेखील त्यांनी मतांसाठी खोटे आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली असे हजारे म्हणाले. मोदी यांनी आपण पाठविलेल्या पत्राची योग्य ती दखल घेण्यात आली नसल्याची खंतदेखील त्यांनी बोलून दाखविली.सरकारची खुर्ची संकटात आली तरच आंदोलनाची दखल घेतली जाते. त्यामुळे जर एखादा बदल घडवून आणायचा असेल तर जनतेने मोठ्या प्रमाणात संघटित व्हायला हवे असे ते म्हणाले. जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडाची त्यांनी निंदा केली. असे प्रकार थांबविण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा वाढवला पाहिजे असे ते म्हणाले. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे व धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ.बबन तायवाडे उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी हजारे यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांनी स्वत:चा संघर्ष व नेमकी स्फूर्ती कुठून मिळते याबाबत माहिती दिली. तसेच तरुणांनी समाजासाठी चांगली कामे करून देशविकासाला हातभार लावावा असे आवाहन केले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांसाठी देशपातळीवर लढा उभारण्याचा विचारस्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची अवस्था ‘माल खाये मदारी ; नाच करे बंदर’ अशी झाल्याची टीका त्यांनी केली. ‘राईट टू रिजेक्ट’ आणि ‘राईट टू रिकॉल’ या दोन गोष्टींनंतर देशपातळीवर शेतकऱ्यांचा लढा उभारणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या आंदोलनाचीदेखील त्यांनी प्रशंसा केली.निवडणुका घटनाबाह्यदरम्यान, यावेळी अण्णा हजारे यांनी देशात घेतल्या जाणाऱ्या निवडणुका घटनाबाह्य असल्याचा आरोप लावला. घटनेमध्ये निवडणुकांमध्ये पक्षाचा कुठेही उल्लेख नाही. केवळ व्यक्ती निवडणुका लढू शकतात, असे नमूद आहे. मग पक्ष कसे काय निवडणुकांत उतरतात? समूहांमुळेच भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगही कारवाई करण्यास धजावत नाही, असा आरोप हजारे यांनी लावला. विद्यार्थ्यांनी अण्णांना अभ्यासू प्रश्न विचारून ‘गुगली’ टाकली.केजरीवाल परत आले तर स्वागतचअरविंद केजरीवाल यांच्या डळमळीत कारभारामुळे आंदोलनाचे नुकसान झाले का, असे विचारले असता त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जर केजरीवाल आंदोलनात परत जुळले तर त्यांचे स्वागत करील. पण मी कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर त्यांनी मौन साधले.