शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी कुणाचा फोन आला नाही; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 18:38 IST

घातपात होऊ शकतो माहित असताना ते दिल्लीला गेले होते. त्याला शूरता म्हणतात असं उदयनराजेंनी सांगितले. 

सातारा - शिवप्रताप दिनानिमित्त किल्ले प्रतापगड येथे सरकारच्या वतीने भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली होती. परंतु कार्यक्रमात छत्रपतींचे वंशज असलेले खासदार उदयनराजे यांची गैरहजेरी प्रामुख्याने दिसून आली. मात्र या कार्यक्रमाबाबत कुणीही मला फोन केला नव्हता असं स्पष्टच उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 

उदयनराजे भोसले म्हणाले की, मी देव पाहिला नाही. महाशिवरात्री, गणेश चर्तुथी ज्यादिवशी असते तेव्हाच साजरी होते. शिवाजी महाराजांबद्दल तारखांचा घोळ का? १० नोव्हेंबरलाच शिवप्रताप दिन साजरा होतो. मला कुणी फोन केला नव्हता. आज सकाळी पत्रिका आली तेव्हा कार्यक्रम आहे समजलं. मला कुणीही बोललं नव्हतं. ज्यावेळी सरकार स्थापन झाले तेव्हा मी कार्यक्रम ठेवतो असं म्हटलं होतं. शिवजयंती ३ दिवस साजरी करतात. ही एकप्रकारे अवहेलना नाही का? परदेशातील लोक विचारतात खरी शिवजयंती कुठली? छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांना पकडून नेले नव्हते स्वत: गेले होते. माफीनामा अजिबात लिहिला नाही. घातपात होऊ शकतो माहित असताना ते दिल्लीला गेले होते. त्याला शूरता म्हणतात असं उदयनराजेंनी सांगितले. 

प्रत्येक राज्य वेगळा देश म्हणून पाहणार का?प्रत्येकजण वैयक्तिक एका समाजाचा विचार करायला लागला तर या देशाचे किती तुकडे होतील? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देशाला अखंड ठेवलंय. जर छत्रपतींच्या विचारांचा विसर पडला तर काय होईल. प्रत्येक राज्य एक वेगळा देश म्हणून विचार करणार आहोत का? असा संतप्त सवाल छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला. 

छत्रपतींनी विचार केला असता तर आजही राजेशाही असती

छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला लोकशाहीचा ढाचा घालून दिला. अजूनही अनेक देशात राजेशाही आहे. छत्रपतींनी विचार केला असता राजेशाही अबाधित ठेवायची तर आजही देशात राजेशाही असते. राज्य कारभारात लोकांचा समावेश व्हावा. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. त्याला आज मंत्रिमंडळ म्हणतात. छत्रपतींच्या विचाराने सर्व लोक एकत्रित आले. स्वराज्य निर्माण झाले असं त्यांनी सांगितले. 

तसेच प्रत्येक पक्ष वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, आदर्श मानतात. पण आता सर्वधर्म समभावाची व्याख्या बदलीय का असा प्रश्न निर्माण होतो. छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि जे आपल्याला सोयीचं आहे तेवढेच घ्यायचे. शिवरायांमुळे भारतात लोकशाही आहे. सर्व पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना राष्ट्रद्रोहाची शिक्षा द्यावी. पहिला समाज, मग जात वैगेरे आली. लोकशाहीत जनता राजे आहे. या जनतेला जबाबदारीने दिशा देणं राजकारण्याचं काम आहे. राज्यपालांसारखं उद्या कुणीही बोलेल. हा देश अखंड ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा तुमचा मुख्य पाया पाहिजे असं छत्रपती खासदार उदयनराजे यांनी म्हटलं. 

दरम्यान, प्रत्येकाला वाटतं देश महासत्तेकडे गेला पाहिजे. देश एकत्रित राहायला हवा. जगातील इतर देशांना आपला देशाचा हेवा वाटला पाहिजे. देश असावा तर भारतासारखा म्हटलं पाहिजे. देशाच्या सीमा आत्ता पडल्यात. पहिल्या नव्हत्या. राज्यपालांनी हे बोलण्याचं धाडस कसं केले. उद्या त्यांच्यापेक्षा मोठ्या पदावर असतील ते बोलतील. केवळ नावापुरता, पुतळे बांधण्यापुरता शिवरायांचा वापर करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले