शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

'उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि इतर मंत्री स्वतःला मुख्यमंत्री मानतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 18:42 IST

'आमच्या काळात प्रकल्पांवर चर्चा व्हायची, पण आज चर्चा होते गांजा, हर्बल तंबाखूवर. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणुन यांची नोंद होणार.'

मुंबई: आज मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, यावेळी राज्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि इतर काही मंत्री आहेत जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. यामुळे महाराष्ट्राच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

सर्वात भ्रष्ट सरकार म्हणुन नोंद होणारमुंबईमध्ये झालेल्या भाजपच्या कार्याकारणी बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं. सुरुवातील फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, पुढे बोलताना महाराष्ट्राच्या विश्वासहर्तेवर प्रश्न निर्माण झाल्याचं म्हणाले. एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि मंत्री आहे की जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ नाही. आमच्या काळात प्रकल्पांवर चर्चा व्हायची, पण आज चर्चा कशावर होते तर गांजा, हर्बल तंबाखूवर. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणुन यांची नोंद होईल, अशी टीका फडणवीसांनी केली.

2024 आधी राज्यात सरकार आलं तर बोनस समजूफडणवीस पुढे म्हणाले, राज्यातले सध्याचे सरकार सर्वच पातळ्यांवर फोल ठरत असून जनतेच्या कल्याणा करता आपल्याला मैदानात उतरावच लागेल. 2024 आधी राज्यात आपले सरकार आले तर बोनस समजू. तसं जर झालंच तर जनतेला उत्तम पर्याय आपण देऊच. पण येणाऱ्या काळात भाजपाचे स्वत:च्या भरवशाचे स्वत:चं सरकार आपण आणून दाखवू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी यावेळी कोरोना संकट, वीजबील थकबाकी, लसीकरण, शेतकरी कर्जमुक्ती योजना, कुपोषण, इंधन दरकपात अशा सर्वच मुद्द्यांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

आता रस्त्यावर उतरुन संघर्ष करावाच लागेलते पुढे म्हणतात, सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे कपडे काढले तरी हे निर्लज्ज आहे. आपल्याला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. ज्यापद्धतीने देशद्रोह्यांबरेबर तुमची पार्टनरशीप, अवैध रेती, अवैध दारू असाच प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. भ्रष्टमार्गाने चालायची सवय नोकरशाहीला लागली तर ती लवकर जात नाही. कोट्यावधी रुपये देवून लोक पदावर येत असतील तर काय होईल. आपण या विरूद्ध संघर्ष करायचा आहे, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना