शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे १५ दिवसांत जलजोडणी!

By admin | Updated: February 4, 2016 04:16 IST

सर्व झोपड्या/वस्त्यांना त्यांच्या अस्तिवात येण्याचा काळ विचारात न घेता जलजोडण्या देण्याबाबतचे धोरण महापालिका तयार करत आहे

मुंबई: सर्व झोपड्या/वस्त्यांना त्यांच्या अस्तिवात येण्याचा काळ विचारात न घेता जलजोडण्या देण्याबाबतचे धोरण महापालिका तयार करत आहे. या संदर्भात अलीकडेच उच्च न्यायालयाने पालिकेला निर्देश दिले होते. हे धोरण मान्य झाल्यास अधिकाधिक अनधिकृत जोडणीधारक अधिकृत जलजोडण्यांच्या कक्षेत येतील. ‘इझ आॅफ डुइंग बिझनेस’ संकल्पने अंतर्गत जलजोडणी प्रक्रिया आता आॅनलाईन करण्यात आली आहे. परिणामी या प्रक्रियेनुसार ग्राहकांना पंधरा दिवसांत जलजोडणी मिळणार आहे.भविष्यात १२४ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. मरोशी-रुपारेल जलबोगद्यासाठी ५० लाख, गुंदवली ते कापूरबावडी आणि कापूरबावडी ते भांडुप या जलबोगद्यासाठी ९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पवई ते वेरवली आणि पवई ते घाटकोपर या जलबोगद्यासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चेंबूर ते परेल जलबोगद्यासाठी ८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चेंबूर ते ट्रॉम्बे जलबोगद्यासाठी ५३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जुन्या बोगद्यांची तपासणी आणि स्थिती सर्वेक्षणासाठी ४.७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलाशयांच्या दुरुस्तीसह पुनर्बांधणीसाठी ११.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलप्रक्रिया केंद्राच्या पुनर्बांधणीसाठी २१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यातील सुधारणेसह नव्या जलवाहिन्या टाकण्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलजोडण्यांचा जुडगा काढण्यासाठी १८.९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. झडप कक्षाच्या दुरुस्तीसाठी ९.१० कोटी, जलवितरण वाहिन्यांच्या अंतर्गत सिमेंट मुलाम्यासाठी ६.६५ कोटी, जलवितरण वाहिन्यांच्या पुनर्वसनासाठी १८०.७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.गारगाई प्रकल्पासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथून प्रतिदिन ४४० दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होईल. पिंजाळ प्रकल्पासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प २०१६-१७ मध्ये पुर्ण होईल. या प्रकल्पातून प्रतिदिन ८६५ दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होईल. दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पातून प्रतिदिन १ हजार ५८६ दशलक्ष लीटर्स पाणी उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)मुंबई: अर्थसंकल्पात दरवर्षी भरीव तरतूद होत असली तरी यापैकी जेमतेम २५ ते ३० टक्के विकासावर खर्च होत आहे़ याची गंभीर दखल घेऊन आयुक्त अजय मेहता यांनी आपल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे़ यापुढे खातेप्रमुखांना प्रकल्प मार्गी लावण्यासाठी डेडलाईनच देण्यात येणार आहे. त्यांचे प्रगती पुस्तक आयुक्त दर महिन्याला तपासणार असून कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीदच त्यांनी अर्थसंकल्पातून अधिकाऱ्यांना दिली आहे़आयुक्त अजय मेहता यांनी पालिकेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली़ अर्थसंकल्पातील तरतुदींचा वेळेवर वापर व्हावा, कामे वेळेत व पारदर्शीपणे व्हावीत यासाठी अतिरिक्त आयुक्तांनाही नियमित सर्व तरतुदींचा आढावा घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत़ तसेच वाढीव खर्च रोखण्यासाठी कामाचा अंदाज तयार करीत असताना कामाचे स्वरुप, जागेची स्थितीचा विचार करुन कामाच्या तांत्रिक बाबी तपासून तपशील तयार करावा, जेणेकरुन कंत्राटामध्ये फेरफार करावी लागणार नाही, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे़ तसेच या कामात कसूर राहिल्यास अधिकाऱ्यांनाच त्यासाठी जबाबदार धरण्यात येणार असल्याचा सज्जड दमही त्यांनी भरला आहे़ (प्रतिनिधी)