शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

ना विलीनीकरण, ना मिळते वेतन

By admin | Updated: January 21, 2017 01:07 IST

जे चालत नाही ते दुकान आपण बंद करतो,’ असे म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चार महिन्यांपुर्वी ‘बालचित्रवाणी’च्या विलीनकरणाची घोषणा केली होती.

पुणे : ‘जे चालत नाही ते दुकान आपण बंद करतो,’ असे म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चार महिन्यांपुर्वी ‘बालचित्रवाणी’च्या विलीनकरणाची घोषणा केली होती. मात्र, विलीनीकरण तर सोडाच अद्याप तेथील कर्मचाऱ्यांचे ३३ महिन्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील टांगती तलवार अद्यापही कायम आहे. केंद्र सरकारने पुण्यासह देशात विविध ठिकाणी बालचित्रवाणी हा उपक्रम सुरू केला. १९८४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाला केंद्र सरकारने कार्यक्रमनिर्मितीसाठी २० वर्षे निधी दिला. सुरुवातीला केवळ ५ वर्षे केंद्राने निधी देऊन नंतर राज्य सरकारने बालचित्रवाणीची जबाबदारी घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र, केंद्राने २० वर्षे भार उचलल्यानंतरही राज्य सरकारने या संस्थेकडे काणाडोळा केला. निधी नसल्याच्या कारणास्तव राज्य सरकारने मार्च २०१४पासून येथील सुमारे ५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकविले होते. त्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनी याविरोधात न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन सुमारे १० महिन्यांपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा आदेश दिला. या कर्मचाऱ्यांना वेतन दिले असले, तरी अद्यापही सुमारे ३० कर्मचारी ३३ महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.शिक्षणमंत्री तावडे यांनी सप्टेंबर २०१६मध्ये पुण्यात बालचित्रवाणीचे बालभारतीमध्ये ई-लर्निंग युनिट म्हणून विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. बालभारतीची अभ्यासमंडळे विद्या प्राधिकरणाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या घोषणेला पहिला तडा गेल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली. तसेच अद्यापही शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना विलीनीकरणाबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. >निधीबाबत उत्तर नाहीचवेतन आणि विलीनीकरणाबाबत काहीच प्रयत्न होताना दिसत नसल्याने बालचित्रवाणीमधील कर्मचाऱ्यांची द्विधा मन:स्थिती आहे. शिक्षण विभागातील विविध आस्थापनांतील मुलाखती, व्हिडिओ तयार करून बालचित्रवाणीतील कर्मचारी संस्थेचा काही खर्च भागवत आहेत. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा निधी कसा उपलब्ध होणार, याबाबत ठोस उत्तर दिले जात नाही.