शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

ना विलीनीकरण, ना मिळते वेतन

By admin | Updated: January 21, 2017 01:07 IST

जे चालत नाही ते दुकान आपण बंद करतो,’ असे म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चार महिन्यांपुर्वी ‘बालचित्रवाणी’च्या विलीनकरणाची घोषणा केली होती.

पुणे : ‘जे चालत नाही ते दुकान आपण बंद करतो,’ असे म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चार महिन्यांपुर्वी ‘बालचित्रवाणी’च्या विलीनकरणाची घोषणा केली होती. मात्र, विलीनीकरण तर सोडाच अद्याप तेथील कर्मचाऱ्यांचे ३३ महिन्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील टांगती तलवार अद्यापही कायम आहे. केंद्र सरकारने पुण्यासह देशात विविध ठिकाणी बालचित्रवाणी हा उपक्रम सुरू केला. १९८४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाला केंद्र सरकारने कार्यक्रमनिर्मितीसाठी २० वर्षे निधी दिला. सुरुवातीला केवळ ५ वर्षे केंद्राने निधी देऊन नंतर राज्य सरकारने बालचित्रवाणीची जबाबदारी घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र, केंद्राने २० वर्षे भार उचलल्यानंतरही राज्य सरकारने या संस्थेकडे काणाडोळा केला. निधी नसल्याच्या कारणास्तव राज्य सरकारने मार्च २०१४पासून येथील सुमारे ५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकविले होते. त्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनी याविरोधात न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन सुमारे १० महिन्यांपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा आदेश दिला. या कर्मचाऱ्यांना वेतन दिले असले, तरी अद्यापही सुमारे ३० कर्मचारी ३३ महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.शिक्षणमंत्री तावडे यांनी सप्टेंबर २०१६मध्ये पुण्यात बालचित्रवाणीचे बालभारतीमध्ये ई-लर्निंग युनिट म्हणून विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. बालभारतीची अभ्यासमंडळे विद्या प्राधिकरणाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या घोषणेला पहिला तडा गेल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली. तसेच अद्यापही शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना विलीनीकरणाबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. >निधीबाबत उत्तर नाहीचवेतन आणि विलीनीकरणाबाबत काहीच प्रयत्न होताना दिसत नसल्याने बालचित्रवाणीमधील कर्मचाऱ्यांची द्विधा मन:स्थिती आहे. शिक्षण विभागातील विविध आस्थापनांतील मुलाखती, व्हिडिओ तयार करून बालचित्रवाणीतील कर्मचारी संस्थेचा काही खर्च भागवत आहेत. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा निधी कसा उपलब्ध होणार, याबाबत ठोस उत्तर दिले जात नाही.