शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown in Maharashtra: राज्यात लॉकडाऊन, जिल्हाबंदी किंवा लोकल बंदी नाही, नाही, नाही! राजेश टोपेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:44 IST

corona Virus in Maharashtra: राज्यात बुधवारी २५ हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यातील १५ हजार रुग्ण मुंबईतील होते. बुधवारी ६० हजार चाचण्या झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईतील लोकल ट्रेन बंद करण्याचा किंवा जिल्हाअंतर्गत बंदीचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्तरावरील विचारविनिमयानंतर कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वाढती रुग्णसंख्या, लसीकरणासह विविध उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, बुधवारी कोरोनाच्या २५ हजार केसेस सापडल्या. उद्या कदाचित ३५ हजार केस असू शकतील. त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली. सध्या घातलेल्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करा. अत्यावश्यक नसलेल्या सेवांमुळे जर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल तर त्यासाठी काही अधिक निर्बंध वाढवायची गरज भासली तर तेही घालावेत, अशा प्रकारची चर्चा करून शरद पवार यांनी आढावा घेतला.

मुंबई, पुणे, ठाण्यातील शाळा व काॅलेजही  बंद केली आहेत. पण शाळा-काॅलेज बंद केल्यानंतर या वयोगटातील तरुण-तरुणी माॅल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी करू लागले तर उद्देश साध्य होणार नाही याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. लसीकरण, औषधे, निर्बंधांवर चर्चा झाली. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांमधील संख्येच्या मर्यादेची कठोरपणे अंमलबजावणी  करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

रात्रीची संचारबंदी व वीक एंड लॉकडाऊनच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर टोपे म्हणाले की, या सर्वांच्या संदर्भात चर्चा झाली, पण कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. सर्व यंत्रणांसह संबंधित घटकांशी चर्चा करूनच असे निर्णय घेतले जातात, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

संसर्ग घशापर्यंतच 

राज्यात बुधवारी २५ हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यातील १५ हजार रुग्ण मुंबईतील होते. बुधवारी ६० हजार चाचण्या झाल्या. त्यापैकी १५ हजार चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्के आहे. पण, रुग्ण संख्येत वाढ होत असली तरीही रुग्णालयातील खाट्या मोठ्या संख्येने रिक्त आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी जमेच्या बाजू आहेत, असे राजेश टोपे म्हणाले. तिसऱ्या लाटेमध्ये सध्या फुप्फुसापर्यंत हा संसर्ग पोहोचत नाही. केवळ घशापर्यंत संसर्ग मर्यादित आहे. घसा, नाकापर्यंत लक्षणे आढळतात. घशात खवखव, सर्दी होणे अशी लक्षणे जाणवत असल्याचे टोपे म्हणाले.

८० लाख लोकांनी लसच घेतली नाही nअद्याप ७० ते ८० लाख लोकांनी एकही लस घेतलेली नाही, अशी माहिती शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत सांगण्यात आली. तेव्हा लसीकरणाचा वेग वाढवा प्रत्यकांनी लस घेतलीच पाहिजे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. एक लस घेतल्यानंतर दुसऱ्या लसीची तारीख उलटून गेल्यावरही अनेकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. nफ्रंटलाईन व हेल्थ वर्कर्स, सहव्याधी असलेल्या व्यक्ती व वयाची साठी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार आहे. स्वत: शरद पवारसुद्धा तिसरा डोस घेतील, असे राजेश टोपे म्हणाले.

‘कोविड रुग्णासोबत एक नातेवाईक राहू शकणार’सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्यप्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. तसेच रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णासाेबत केवळ एकाच नातेवाइकाला बरोबर राहण्याची परवानगी देण्यात यावी. जेणेकरून अधिक संसर्ग पसरणार नाही, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. राज्यातील कोविडची सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबतच्या आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र कोरोना रूग्णासोबत नातेवाईक राहू लागले तर ते बाधित होणार नाहीत का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस