शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही

By appasaheb.patil | Updated: November 20, 2019 14:49 IST

सुभाष देशमुख; राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं

ठळक मुद्दे- माजी सहकारमंत्री आ़ सुभाष देशमुख यांचा सोलापुरात वार्तालाप- कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली टीका- सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेला सर्व दरवाजे खुले 

सोलापूर : भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष हिंदुत्ववादी आहेत आणि हिदुत्वाच्या आधारावरच या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन करण्याचा डाव आखत आहेत़ मात्र राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही असा विश्वास माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़ पुढे बोलताना सुभाष देशमुख म्हणाले की, राज्यात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती करून विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत़ यात भाजपाचे १०५ तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत़ ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री असावा हा अलिखित नियम आहे. त्यामुळे भाजपने सत्ता स्थापन करताना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असा आग्रह धरला आहे. मात्र शिवसेनेने अवाढव्य मागण्या केल्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यास विलंब झाला.

 महायुतीने सत्तास्थापन न करून राज्यातील जनतेची घोर निराशा केली आहे़ आता शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करीत आहे़ मात्र भाजपला सोडून कोणतेही सरकार राज्यात सर्वाधिक काळ टिकणार नाही़ एवढेच नव्हे तर ते सरकार सुरक्षित राहील की नाही हेही सांगणे अवघड असल्याचं मत माजी सहकारमंत्री आ़ सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

दरम्यान, भाजप - शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत़ एकत्र येऊन बसल्याशिवाय युतीचं सत्तास्थापन अशक्य आहे़ राजकारणात कधीही काहीही होवू शकतं असंही देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा