शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Palghar Mob Lynching: लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:51 IST

गडचिंचलेप्रकरणी कठोर कारवाई

पालघर : गडचिंचलेच्या प्रकरणावरून काही लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे यापुढे हा धाक राहावा यासाठी कठोरातील कठोर पावले उचलली जातील, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमध्ये देत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.जिल्ह्यात प्रत्येक भागात पेट्रोलिंग आणि गस्त घालण्याचे आदेश आपण दिल्याचे सांगून या प्रकरणातील दोषी हे कुठल्याही पक्षाचे असोत, कितीही मोठी व्यक्ती असो, त्यांच्यावर कठोर कारवाईच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत. १५ एप्रिलला डॉ. विश्वास वळवी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथे आलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक हत्याकांडाचे प्रकरण घडले, त्या कासा पोलीस ठाण्याला शिंदे यांनी भेट देत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांना सूचना दिल्या. या वेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आ. श्रीनिवास वणगा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, सुरेंद्र नवले, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण आदी उपस्थित होते.पोलीस प्रशासनाने बोध घेतला नाही.एका सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाने या घटनेतून कुठलाही बोध घेतला नसल्याचे मान्य करीत गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश मी दिले असून यापुढे अत्यावश्यक गरजेशिवाय कुणीही बाहेर पडल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेLynchingलीचिंग