शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: 'या' गावात पुढाऱ्यांना 'नो एंट्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:01 IST

विधानसभा निवडणुकीला मतदान न करण्याचा निर्णय सुद्धा या गावकऱ्यांनी घेतला आहे.

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या प्रश्नांवर आक्रमक होताना दिसत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर ते रघुनाथपूरवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, ग्रामस्थांनी रस्त्याचे काम करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे सातत्याने करून देखील केवळ मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधीनी या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयएसओ मानांकित ग्रामपंचायत असलेल्या रघुनाथपूरवाडीला शिऊर गावाने जोडणारा सहा किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाला आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याचे भाग्य काही उजळले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जो पर्यंत गावाला जोडणारा रस्ता बनत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्याच बरोबर विधानसभा निवडणुकीला मतदान न करण्याचा निर्णय सुद्धा या गावकऱ्यांनी घेतला आहे.

विशेष म्हणजे याच गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकला होता. प्रशासकीय अधिकरी व राजकीय नेत्यांच्या विनंतीनंतर सुद्धा गावकऱ्यांनी आधी रस्ता त्यांनतरचं मतदान करण्याची भूमिका घेतली होती. मात्र अजूनही हा रस्ता बनला नसल्याने आता पुन्हा गावकऱ्यांनी आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधीना आता तर जाग येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.