शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

शिक्षणाची दुकाने नको, गुणवत्ता हवी - मुख्यमंत्री

By admin | Updated: September 24, 2016 03:41 IST

शिक्षणाची केवळ दुकाने उघडून बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची वेळ आली आहे

पुणे : शिक्षणाची केवळ दुकाने उघडून बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची वेळ आली आहे. केवळ पदव्या देऊन चालणार नाही, तर शिक्षणातून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हायला हवी. तेव्हाच आपण एकविसाव्या शतकातील आव्हानांचा सामना करू शकू. यामध्ये शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.माईर्स एमआयटी येथे आयोजित पहिल्या नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की केवळ पदवी नव्हे, तर मूलभूत ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळायला हवे, अशी शिक्षणपद्धती तयार करण्याची गरज आहे. आपण किती इंजिनीअर तयार केले यापेक्षा त्यांना किती ज्ञान मिळाले, हे महत्त्वाचे आहे. शिक्षण संस्थांसाठीची नियामक मंडळे कमी असायला हवीत; तसेच महाविद्यालयांना स्वायत्तता मिळावी.देश संक्रमणातून जात असताना अनेक आव्हानांबरोबरच संधीही निर्माण झाल्या आहेत. देशातील तरुणाई ही आपली खरी ताकद आहे. २०२०मध्ये भारत जगातील सर्वांत तरुण देश असेल. पण केवळ युवाशक्तीवर भारत विश्वगुरू बनणार नाही. त्यासाठी या तरुणाईचे रूपांतर कुशल मनुष्यबळात करावे लागणार आहे. त्यासाठी तशी शिक्षणपद्धती, शिक्षक तयार करायला हवेत, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी )>...तर शिक्षकांचेही रँकिंगकार्यक्रमामध्ये टीचर्स काँग्रेसचे निमंत्रक प्रा. राहुल कराड यांनी शिक्षकांचे विषयनिहाय रँकिंगबाबत मांडलेल्या कल्पनेला फडणवीस यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘ही चांगली कल्पना आहे. मात्र, शिक्षणाशी संंबंधित विविध घटक आहे. त्यामध्ये शिक्षक संघटनाही आहेत. या संघटनांही रँकिंगला सहमती दर्शविली तर लगेचच समिती नेमून पुढील वर्षीपासून ही प्रक्रिया सुरू करू. लोकशाहीच्या माध्यमातूनच याचा निर्णय घेतला जाईल,’ असे फडणवीस म्हणाले.