शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

शिक्षणाची दुकाने नको, गुणवत्ता हवी - मुख्यमंत्री

By admin | Updated: September 24, 2016 03:41 IST

शिक्षणाची केवळ दुकाने उघडून बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची वेळ आली आहे

पुणे : शिक्षणाची केवळ दुकाने उघडून बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची वेळ आली आहे. केवळ पदव्या देऊन चालणार नाही, तर शिक्षणातून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हायला हवी. तेव्हाच आपण एकविसाव्या शतकातील आव्हानांचा सामना करू शकू. यामध्ये शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.माईर्स एमआयटी येथे आयोजित पहिल्या नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की केवळ पदवी नव्हे, तर मूलभूत ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळायला हवे, अशी शिक्षणपद्धती तयार करण्याची गरज आहे. आपण किती इंजिनीअर तयार केले यापेक्षा त्यांना किती ज्ञान मिळाले, हे महत्त्वाचे आहे. शिक्षण संस्थांसाठीची नियामक मंडळे कमी असायला हवीत; तसेच महाविद्यालयांना स्वायत्तता मिळावी.देश संक्रमणातून जात असताना अनेक आव्हानांबरोबरच संधीही निर्माण झाल्या आहेत. देशातील तरुणाई ही आपली खरी ताकद आहे. २०२०मध्ये भारत जगातील सर्वांत तरुण देश असेल. पण केवळ युवाशक्तीवर भारत विश्वगुरू बनणार नाही. त्यासाठी या तरुणाईचे रूपांतर कुशल मनुष्यबळात करावे लागणार आहे. त्यासाठी तशी शिक्षणपद्धती, शिक्षक तयार करायला हवेत, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी )>...तर शिक्षकांचेही रँकिंगकार्यक्रमामध्ये टीचर्स काँग्रेसचे निमंत्रक प्रा. राहुल कराड यांनी शिक्षकांचे विषयनिहाय रँकिंगबाबत मांडलेल्या कल्पनेला फडणवीस यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘ही चांगली कल्पना आहे. मात्र, शिक्षणाशी संंबंधित विविध घटक आहे. त्यामध्ये शिक्षक संघटनाही आहेत. या संघटनांही रँकिंगला सहमती दर्शविली तर लगेचच समिती नेमून पुढील वर्षीपासून ही प्रक्रिया सुरू करू. लोकशाहीच्या माध्यमातूनच याचा निर्णय घेतला जाईल,’ असे फडणवीस म्हणाले.