शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

थेट कर्जमाफी नाही

By admin | Updated: March 15, 2017 03:54 IST

राज्यातील शेतकऱ्यांचे अल्पमुदती कर्ज माफ करायचे म्हटले तरी २४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा भार शासकीय तिजोरीवर पडेल आणि शेतकऱ्यांऐवजी बँकांचा फा

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे अल्पमुदती कर्ज माफ करायचे म्हटले तरी २४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा भार शासकीय तिजोरीवर पडेल आणि शेतकऱ्यांऐवजी बँकांचा फायदा होईल म्हणून कर्जमाफी देण्याऐवजी कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवावी या भूमिकेवर राज्य शासन सध्यातरी ठाम आहे. असे असले तरी ‘कर्जमाफी नाही तर अधिवेशन नाही’ असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही घेतला असल्याने उद्यापासून पुन्हा सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात कर्जमाफीवरून प्रचंड गदारोळ होण्याचीच शक्यता अधिक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेनेही कर्जमाफीच्या आखाड्यात उडी घेतली. त्यातच भाजपाचेही सदस्य कर्जमाफीसाठी सभागृहात जोरदार घोषणा देऊ लागल्याने कर्जमाफीची मागणी आता सर्वपक्षीय बनली आहे. याच मागणीवरून झालेल्या प्रचंड गदारोळामुळे गेल्या आठवड्यात तब्बल चार दिवस विधानसभेचे कामकाज ठप्प झाले होते. चार दिवसांच्या सुटीनंतर आता अधिवेशन बुधवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. राज्यावरील कर्जाचा वाढता डोंगर, नोटाबंदी आणि अन्य कारणांमुळे उत्पन्नात झालेली घट, २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय तरतुदींना १० ते १५ टक्के कट लावण्याची आलेली पाळी या पार्श्वभूमीवर, कर्जमाफीचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की थेट कर्जमाफी न देता कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे, अन्य अल्प व दीर्घकालिन उपाययोजनांद्वारे शेती व्यवसाय नफ्याचा करणे यावर सरकारचा भर असेल. १८ मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब दिसेल. सरकारवर कर्जमाफीचा दबाव फारच वाढला तर काही सवलतींची घोषणा केली जाऊ शकते. (विशेष प्रतिनिधी) १कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांमधून नाही तर राजकीय पक्षांची आहे. कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल नाराजी असती तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्या आधी नगरपालिका निवडणुकीत भाजपाला इतके चांगले यश मिळाले नसते, असा युक्तिवाद त्यासाठी केला जात आहे. तसेच, कर्जमाफीचा निर्णय हा अत्यंत असाधारण दुष्काळी परिस्थती घेतला जाऊ शकतो. गेल्या दहा वर्षांत सर्वात यंदा चांगली पीक परिस्थिती असताना कर्जमाफीची गरज नाही, हे कारणही दिले जात आहे. २त्याचवेळी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच असून त्या कर्जाच्या बोजापायी होत असल्याने कर्जमाफीशिवाय त्या थांबणार नाहीत, असा तर्क विरोधक आणि शिवसेनेकडूनही दिला जात आहे. कर्जमाफी हा एक उपाय असू शकतो पण तो अंतिम व एकमेव उपाय नाही,अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आले आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांना अंमलबजावणीची प्रतीक्षा२०१६-१७ च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या काही घोषणांना अद्यापही अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. कृषी क्षेत्रातील विविध घडामोडी, संशोधन व समुपदेशन आदी बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय कृषी मार्गदर्शक योजना जाहीर करण्यात आली होती. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेशी या योजनेचे साधर्म्य असल्याचे नंतर लक्षात आल्याने ती रखडली आहे. ग्रामीण युवकांसाठी पालकमंत्री अर्थ मुव्हिंग मशीन्स खरेदी योजना जाहीर झाली होती पण ती अमलात आलेली नाही. कृषीभूषण पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे इतरांना मार्गदर्शन लाभावे म्हणून ‘कृषी गुरुकुल’ योजना जाहीर झाली होती ती पण सुरू झाली नाही.