शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

थेट कर्जमाफी नाही

By admin | Updated: March 15, 2017 03:54 IST

राज्यातील शेतकऱ्यांचे अल्पमुदती कर्ज माफ करायचे म्हटले तरी २४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा भार शासकीय तिजोरीवर पडेल आणि शेतकऱ्यांऐवजी बँकांचा फा

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे अल्पमुदती कर्ज माफ करायचे म्हटले तरी २४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा भार शासकीय तिजोरीवर पडेल आणि शेतकऱ्यांऐवजी बँकांचा फायदा होईल म्हणून कर्जमाफी देण्याऐवजी कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवावी या भूमिकेवर राज्य शासन सध्यातरी ठाम आहे. असे असले तरी ‘कर्जमाफी नाही तर अधिवेशन नाही’ असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही घेतला असल्याने उद्यापासून पुन्हा सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात कर्जमाफीवरून प्रचंड गदारोळ होण्याचीच शक्यता अधिक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेनेही कर्जमाफीच्या आखाड्यात उडी घेतली. त्यातच भाजपाचेही सदस्य कर्जमाफीसाठी सभागृहात जोरदार घोषणा देऊ लागल्याने कर्जमाफीची मागणी आता सर्वपक्षीय बनली आहे. याच मागणीवरून झालेल्या प्रचंड गदारोळामुळे गेल्या आठवड्यात तब्बल चार दिवस विधानसभेचे कामकाज ठप्प झाले होते. चार दिवसांच्या सुटीनंतर आता अधिवेशन बुधवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. राज्यावरील कर्जाचा वाढता डोंगर, नोटाबंदी आणि अन्य कारणांमुळे उत्पन्नात झालेली घट, २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय तरतुदींना १० ते १५ टक्के कट लावण्याची आलेली पाळी या पार्श्वभूमीवर, कर्जमाफीचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की थेट कर्जमाफी न देता कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे, अन्य अल्प व दीर्घकालिन उपाययोजनांद्वारे शेती व्यवसाय नफ्याचा करणे यावर सरकारचा भर असेल. १८ मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब दिसेल. सरकारवर कर्जमाफीचा दबाव फारच वाढला तर काही सवलतींची घोषणा केली जाऊ शकते. (विशेष प्रतिनिधी) १कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांमधून नाही तर राजकीय पक्षांची आहे. कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल नाराजी असती तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्या आधी नगरपालिका निवडणुकीत भाजपाला इतके चांगले यश मिळाले नसते, असा युक्तिवाद त्यासाठी केला जात आहे. तसेच, कर्जमाफीचा निर्णय हा अत्यंत असाधारण दुष्काळी परिस्थती घेतला जाऊ शकतो. गेल्या दहा वर्षांत सर्वात यंदा चांगली पीक परिस्थिती असताना कर्जमाफीची गरज नाही, हे कारणही दिले जात आहे. २त्याचवेळी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच असून त्या कर्जाच्या बोजापायी होत असल्याने कर्जमाफीशिवाय त्या थांबणार नाहीत, असा तर्क विरोधक आणि शिवसेनेकडूनही दिला जात आहे. कर्जमाफी हा एक उपाय असू शकतो पण तो अंतिम व एकमेव उपाय नाही,अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आले आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांना अंमलबजावणीची प्रतीक्षा२०१६-१७ च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या काही घोषणांना अद्यापही अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. कृषी क्षेत्रातील विविध घडामोडी, संशोधन व समुपदेशन आदी बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय कृषी मार्गदर्शक योजना जाहीर करण्यात आली होती. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेशी या योजनेचे साधर्म्य असल्याचे नंतर लक्षात आल्याने ती रखडली आहे. ग्रामीण युवकांसाठी पालकमंत्री अर्थ मुव्हिंग मशीन्स खरेदी योजना जाहीर झाली होती पण ती अमलात आलेली नाही. कृषीभूषण पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे इतरांना मार्गदर्शन लाभावे म्हणून ‘कृषी गुरुकुल’ योजना जाहीर झाली होती ती पण सुरू झाली नाही.