शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 07:43 IST

सरकार एक सांगते, टास्क फोर्स वेगळेच

ठाणे/नवी मुंबई : शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार, टास्क फोर्स आणि मंत्र्यांमध्येच समन्वय नसल्याची टीका विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाण्यात केली. मंत्री वेगवेगळी घोषणा करतात, सरकार वेगळीच घोषणा करते आणि टास्क फोर्स काही तरी तिसरेच ठरवते. यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, त्यामुळे एक ठाम निर्णय सरकारने जाहीर करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.संस्कार स्टडी क्लाऊड लोकार्पण सोहळ्यासाठी ते ठाण्यात आले होते. शाळा सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सरकार, मंत्री आणि टास्क फोर्सच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा, जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आरक्षण प्रश्नावर सरकारचा वेळकाढूपणाकेंद्र सरकारने बुधवारी १२७ वी घटनादुरुस्ती करून, कुठल्याही समाजाला मागास ठरविण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. मराठा आरक्षण आम्ही दिले, ते उच्च न्यायालयात टिकलेही होते. महाविकास आघाडी केवळ राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसून वेळकाढूपणा करत आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीचे राज्य नाहीसंसदेचे अधिवेशन २५ दिवस चालू शकते. परंतु महाराष्ट्रातील अधिवेशन दोन दिवसांपेक्षा अधिक चालू शकत नाही. अधिवेशनात प्रश्न विचारायचे नाहीत, लक्षवेधी घ्यायच्या नाहीत, चर्चा करायची नाही. म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने जे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, त्यांची दारे बंद करण्यात आली असल्याची टीका फडणवीस यांनी केली.शिक्षणसम्राटांचे सरकार राज्यात शिक्षणसम्राटांचे सरकार असल्याने विद्यार्थ्यांची शुल्क माफी होईल असे वाटत नाही. परंतु शुल्क माफीचा उच्च न्यायालयाचा आदेश असून त्याचे पालन झाले नाही, तर त्यासंदर्भात राज्यात भाजपच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस