शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 07:43 IST

सरकार एक सांगते, टास्क फोर्स वेगळेच

ठाणे/नवी मुंबई : शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार, टास्क फोर्स आणि मंत्र्यांमध्येच समन्वय नसल्याची टीका विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाण्यात केली. मंत्री वेगवेगळी घोषणा करतात, सरकार वेगळीच घोषणा करते आणि टास्क फोर्स काही तरी तिसरेच ठरवते. यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, त्यामुळे एक ठाम निर्णय सरकारने जाहीर करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.संस्कार स्टडी क्लाऊड लोकार्पण सोहळ्यासाठी ते ठाण्यात आले होते. शाळा सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सरकार, मंत्री आणि टास्क फोर्सच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा, जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आरक्षण प्रश्नावर सरकारचा वेळकाढूपणाकेंद्र सरकारने बुधवारी १२७ वी घटनादुरुस्ती करून, कुठल्याही समाजाला मागास ठरविण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. मराठा आरक्षण आम्ही दिले, ते उच्च न्यायालयात टिकलेही होते. महाविकास आघाडी केवळ राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसून वेळकाढूपणा करत आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीचे राज्य नाहीसंसदेचे अधिवेशन २५ दिवस चालू शकते. परंतु महाराष्ट्रातील अधिवेशन दोन दिवसांपेक्षा अधिक चालू शकत नाही. अधिवेशनात प्रश्न विचारायचे नाहीत, लक्षवेधी घ्यायच्या नाहीत, चर्चा करायची नाही. म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने जे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, त्यांची दारे बंद करण्यात आली असल्याची टीका फडणवीस यांनी केली.शिक्षणसम्राटांचे सरकार राज्यात शिक्षणसम्राटांचे सरकार असल्याने विद्यार्थ्यांची शुल्क माफी होईल असे वाटत नाही. परंतु शुल्क माफीचा उच्च न्यायालयाचा आदेश असून त्याचे पालन झाले नाही, तर त्यासंदर्भात राज्यात भाजपच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस