शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

भाजपच्या एकाही सदस्याने शिवी दिली नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:18 IST

गोंधळाचा विषय माफी मागून संपवण्यात आला होता. तरीही कथानक तयार करून १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. विरोधकांची संख्या कमी केली, तर त्यांची ताकद कमी होईल, असे सरकारला वाटत असेल. पण, तसे होणार नाही. १२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई : ओबीसी आरक्षणात सरकारचे अपयश दाखविल्यामुळे आमच्या १२ आमदारांना खोटे आरोप लावून निलंबित करण्यात आले. एक वर्ष काय, ५ वर्ष निलंबित केले तरी त्याची पर्वा नाही. भाजपाच्या एकाही सदस्यांनी शिवी दिली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.गोंधळाचा विषय माफी मागून संपवण्यात आला होता. तरीही कथानक तयार करून १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. विरोधकांची संख्या कमी केली, तर त्यांची ताकद कमी होईल, असे सरकारला वाटत असेल. पण, तसे होणार नाही. १२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षण असो की, मराठा आरक्षण हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. याच सरकारने गठीत केलेल्या न्या. भोसले समितीने अतिशय स्पष्टपणे सांगितले असल्याचे ते म्हणाले. 

निलंबित आमदार राजभवनवर -- विधानसभेतील भाजपाच्या निलंबित १२ आमदारांनी सोमवारी राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्यावरील निलंबनाची कारवाई आम्हाला मान्य नसून उलट महाविकास आघाडीच्या सदस्यांनीच हातापाई केल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या निवेदनात केला.- सर्व बाबी स्पष्ट होण्यासाठी राज्यपालांनी संपूर्ण अहवाल मागवावा. तसेच राज्य सरकारला योग्य त्या सूचना, समज द्यावी आणि लोकशाही मूल्यांची गळचेपी आणि अवमुल्यन तातडीने रोखावे, अशी मागणीही त्यांनी केली. - आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, पराग अळवणी, जयकुमार रावल, संजय कुटे, राम सातपुते, हरिष पिंपळे, गिरिष महाजन, अभिमन्यू पवार, किर्तीकुमार भांगडीया आणि नारायण कुचे या निलिंबित बारा आमदारांनी राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले.

स्वायत्ततेचा अर्थ स्वैराचार होतो का? एमपीएससीला स्वायत्तता आहे पण त्याचा अर्थ स्वैराचार होत नाही. आणखी किती स्वप्निल लोणकरचे बळी घेतले जाणार आहेत, असे खडेबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. राज्य सरकारसमोर एकमेव पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे तत्काळ मागासवर्ग आयोग गठीत करणे. तरीसुद्धा केवळ राजकीय कारणांसाठी ठराव करणे, यातून सरकारला केवळ वेळ मारून न्यायची आहे, हेच दिसून येते. टोलवाटोलवीच्या पलिकडे यातून काहीही साध्य होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.  अजित पवारांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने भाजप सदस्यांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस