शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भाजपच्या एकाही सदस्याने शिवी दिली नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:18 IST

गोंधळाचा विषय माफी मागून संपवण्यात आला होता. तरीही कथानक तयार करून १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. विरोधकांची संख्या कमी केली, तर त्यांची ताकद कमी होईल, असे सरकारला वाटत असेल. पण, तसे होणार नाही. १२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई : ओबीसी आरक्षणात सरकारचे अपयश दाखविल्यामुळे आमच्या १२ आमदारांना खोटे आरोप लावून निलंबित करण्यात आले. एक वर्ष काय, ५ वर्ष निलंबित केले तरी त्याची पर्वा नाही. भाजपाच्या एकाही सदस्यांनी शिवी दिली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.गोंधळाचा विषय माफी मागून संपवण्यात आला होता. तरीही कथानक तयार करून १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. विरोधकांची संख्या कमी केली, तर त्यांची ताकद कमी होईल, असे सरकारला वाटत असेल. पण, तसे होणार नाही. १२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षण असो की, मराठा आरक्षण हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. याच सरकारने गठीत केलेल्या न्या. भोसले समितीने अतिशय स्पष्टपणे सांगितले असल्याचे ते म्हणाले. 

निलंबित आमदार राजभवनवर -- विधानसभेतील भाजपाच्या निलंबित १२ आमदारांनी सोमवारी राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्यावरील निलंबनाची कारवाई आम्हाला मान्य नसून उलट महाविकास आघाडीच्या सदस्यांनीच हातापाई केल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या निवेदनात केला.- सर्व बाबी स्पष्ट होण्यासाठी राज्यपालांनी संपूर्ण अहवाल मागवावा. तसेच राज्य सरकारला योग्य त्या सूचना, समज द्यावी आणि लोकशाही मूल्यांची गळचेपी आणि अवमुल्यन तातडीने रोखावे, अशी मागणीही त्यांनी केली. - आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, पराग अळवणी, जयकुमार रावल, संजय कुटे, राम सातपुते, हरिष पिंपळे, गिरिष महाजन, अभिमन्यू पवार, किर्तीकुमार भांगडीया आणि नारायण कुचे या निलिंबित बारा आमदारांनी राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले.

स्वायत्ततेचा अर्थ स्वैराचार होतो का? एमपीएससीला स्वायत्तता आहे पण त्याचा अर्थ स्वैराचार होत नाही. आणखी किती स्वप्निल लोणकरचे बळी घेतले जाणार आहेत, असे खडेबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. राज्य सरकारसमोर एकमेव पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे तत्काळ मागासवर्ग आयोग गठीत करणे. तरीसुद्धा केवळ राजकीय कारणांसाठी ठराव करणे, यातून सरकारला केवळ वेळ मारून न्यायची आहे, हेच दिसून येते. टोलवाटोलवीच्या पलिकडे यातून काहीही साध्य होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.  अजित पवारांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने भाजप सदस्यांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस