शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

हल्लाबोल नव्हे, डल्लामार यात्रा, मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:01 IST

१५ वर्षे मागील सरकारने स्वत:च्या तिजोरीचे सिंचन केले. आता हल्लाबोल मोर्चे काढून आमच्यावर आरोप केले जातात; परंतु ही डल्लामार यात्रा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बीड : १५ वर्षे मागील सरकारने स्वत:च्या तिजोरीचे सिंचन केले. आता हल्लाबोल मोर्चे काढून आमच्यावर आरोप केले जातात; परंतु ही डल्लामार यात्रा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते सरपंच मेळाव्यात बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, विरोधकांकडून कर्जमाफीवरून आमच्यावर टीका केली जाते. आम्ही चुकतही असू; परंतु आमचे काम प्रामाणिक आहे. मागील १५ वर्षांत सरकारने काय दिवे लावले, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता विरोधकांनी हल्लाबोल करून जनतेची दिशाभूल करू नये. आमच्याकडेही भरपूर मालमसाला आहे. तो जर आम्ही बाहेर काढला तर हल्लाबोल काढणाºयांनाच स्वत:वर हल्ला करून घेण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. कृष्णा खोºयातील पाणी मराठवाड्याला मिळत नव्हते. भाजप सरकार येताच केंद्राकडून त्याला मान्यता आणली. त्याप्रमाणे ३५० कोटींची मंजुरी घेऊन कामास सुरुवातही केली. चार वर्षांत मराठवाड्याला पाणी दिले जाईल, असेही फडणवीस म्हणाले....त्यांना पाणी पाजायचेयभाषण सुरू असताना फडणवीस यांनी सिक्युरिटीला पाणी मागितले. पंकजा मुंडे यांनी त्यांना पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी हल्लाबोलवाल्यांना पाणी पाजायचेय म्हणून मी पाणी पिलो, असे फडणवीस म्हणाले.आंदोलकांना अटक : उसाला पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे भाव मिळालाच पाहिजे, यासह इतर मागण्यांसाठी वडवणी तालुक्यातीलल पाच गावच्या नागरिकांनी सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन केले. मुख्यमंत्री फडणवीस येण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार