शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

हल्लाबोल नव्हे, डल्लामार यात्रा, मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:01 IST

१५ वर्षे मागील सरकारने स्वत:च्या तिजोरीचे सिंचन केले. आता हल्लाबोल मोर्चे काढून आमच्यावर आरोप केले जातात; परंतु ही डल्लामार यात्रा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बीड : १५ वर्षे मागील सरकारने स्वत:च्या तिजोरीचे सिंचन केले. आता हल्लाबोल मोर्चे काढून आमच्यावर आरोप केले जातात; परंतु ही डल्लामार यात्रा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते सरपंच मेळाव्यात बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, विरोधकांकडून कर्जमाफीवरून आमच्यावर टीका केली जाते. आम्ही चुकतही असू; परंतु आमचे काम प्रामाणिक आहे. मागील १५ वर्षांत सरकारने काय दिवे लावले, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता विरोधकांनी हल्लाबोल करून जनतेची दिशाभूल करू नये. आमच्याकडेही भरपूर मालमसाला आहे. तो जर आम्ही बाहेर काढला तर हल्लाबोल काढणाºयांनाच स्वत:वर हल्ला करून घेण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. कृष्णा खोºयातील पाणी मराठवाड्याला मिळत नव्हते. भाजप सरकार येताच केंद्राकडून त्याला मान्यता आणली. त्याप्रमाणे ३५० कोटींची मंजुरी घेऊन कामास सुरुवातही केली. चार वर्षांत मराठवाड्याला पाणी दिले जाईल, असेही फडणवीस म्हणाले....त्यांना पाणी पाजायचेयभाषण सुरू असताना फडणवीस यांनी सिक्युरिटीला पाणी मागितले. पंकजा मुंडे यांनी त्यांना पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी हल्लाबोलवाल्यांना पाणी पाजायचेय म्हणून मी पाणी पिलो, असे फडणवीस म्हणाले.आंदोलकांना अटक : उसाला पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे भाव मिळालाच पाहिजे, यासह इतर मागण्यांसाठी वडवणी तालुक्यातीलल पाच गावच्या नागरिकांनी सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन केले. मुख्यमंत्री फडणवीस येण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार