शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

हल्लाबोल नव्हे, डल्लामार यात्रा, मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:01 IST

१५ वर्षे मागील सरकारने स्वत:च्या तिजोरीचे सिंचन केले. आता हल्लाबोल मोर्चे काढून आमच्यावर आरोप केले जातात; परंतु ही डल्लामार यात्रा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बीड : १५ वर्षे मागील सरकारने स्वत:च्या तिजोरीचे सिंचन केले. आता हल्लाबोल मोर्चे काढून आमच्यावर आरोप केले जातात; परंतु ही डल्लामार यात्रा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते सरपंच मेळाव्यात बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, विरोधकांकडून कर्जमाफीवरून आमच्यावर टीका केली जाते. आम्ही चुकतही असू; परंतु आमचे काम प्रामाणिक आहे. मागील १५ वर्षांत सरकारने काय दिवे लावले, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता विरोधकांनी हल्लाबोल करून जनतेची दिशाभूल करू नये. आमच्याकडेही भरपूर मालमसाला आहे. तो जर आम्ही बाहेर काढला तर हल्लाबोल काढणाºयांनाच स्वत:वर हल्ला करून घेण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. कृष्णा खोºयातील पाणी मराठवाड्याला मिळत नव्हते. भाजप सरकार येताच केंद्राकडून त्याला मान्यता आणली. त्याप्रमाणे ३५० कोटींची मंजुरी घेऊन कामास सुरुवातही केली. चार वर्षांत मराठवाड्याला पाणी दिले जाईल, असेही फडणवीस म्हणाले....त्यांना पाणी पाजायचेयभाषण सुरू असताना फडणवीस यांनी सिक्युरिटीला पाणी मागितले. पंकजा मुंडे यांनी त्यांना पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी हल्लाबोलवाल्यांना पाणी पाजायचेय म्हणून मी पाणी पिलो, असे फडणवीस म्हणाले.आंदोलकांना अटक : उसाला पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे भाव मिळालाच पाहिजे, यासह इतर मागण्यांसाठी वडवणी तालुक्यातीलल पाच गावच्या नागरिकांनी सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन केले. मुख्यमंत्री फडणवीस येण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार