शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

राजकीय दबावामुळे कारवाई नाही

By admin | Updated: February 1, 2017 02:14 IST

राजकीय पक्षांच्या दबावामुळे बेकायदा होर्डिंग, बॅनर्स व पोस्टर्सवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने

मुंबई: राजकीय पक्षांच्या दबावामुळे बेकायदा होर्डिंग, बॅनर्स व पोस्टर्सवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने आता केंद्र व राज्य निवडणूक आयोगानेच याला आळा घालण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी काही मागदर्शक तत्त्वे आखली आहेत. याच मागदर्शक तत्त्वांमध्ये सार्वजनिक संपत्ती विद्रूप न करण्यासंदर्भात अट घालावी, अशी सूचना न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने केली. केंद्रीय व निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना किंवा उमदेवारांना घातलेल्या वेगवेगळ्या अटी किंवा नियमांबरोबरच बेकायदा बॅनर्स, होर्डिंग किंवा पोस्टर्स लावून शहराचा चेहरा विद्रूप न करण्याच्या अटीचा किंवा नियमाचा समावेश करणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले.बेकायदा होर्डिंग, बॅनर्स आणि पोस्टर्स हटवण्याच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी दोन सदस्यांची समिती नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्यात नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश करा, असेही खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले.स्थानिक सुकाणू अधिकारी (नोडल आॅफिसर), स्थानिक पोलीस, नागरी व महसूल अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला या द्विसदस्यीय समितीला अहवाल सादर करावा आणि ही समिती कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित राजकीय पक्षांची नावे सरकारच्या संकेतस्थळावर टाकतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस काहीच कारवाई केली जात नाही, अशी तक्रारही काही याचिकाकर्त्यांनी खंडपीठाकडे केली. याची दखल घेत, उच्च न्यायालयाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या इनचार्जला कोणी बेकायदा होर्डिंग, बॅनर्सकिंवा पोस्टर्ससंबंधी तोंडी तक्रार केली, तरी त्या तक्रारीची दखल घेऊन एफआयआर करण्याचे निर्देश दिले. ‘जर तुम्ही (पोलीस) कारवाई केली नाहीत, तर तुमच्याविरुद्ध आदेशाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करू, तसेच खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश देऊ,’ अशी तंबीच उच्च न्यायालयाने पोलिसांना दिली. (प्रतिनिधी) होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेशबेकायदा होर्डिंग, बॅनर्स किंवा पोस्टर्स लावून शहराचा चेहरा विद्रूप करण्यात येतो, तसेच स्थानिक संस्थांचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात येत असल्याने, अशा प्रकारचे बेकायदा कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश संबंधित स्थानिक संस्थांना व सरकारला द्यावा, अशी मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशन व मुंबईच्या जनहित मंच या एनजीओंचा समावेश आहे.