शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

राजकीय दबावामुळे कारवाई नाही

By admin | Updated: February 1, 2017 02:14 IST

राजकीय पक्षांच्या दबावामुळे बेकायदा होर्डिंग, बॅनर्स व पोस्टर्सवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने

मुंबई: राजकीय पक्षांच्या दबावामुळे बेकायदा होर्डिंग, बॅनर्स व पोस्टर्सवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने आता केंद्र व राज्य निवडणूक आयोगानेच याला आळा घालण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी काही मागदर्शक तत्त्वे आखली आहेत. याच मागदर्शक तत्त्वांमध्ये सार्वजनिक संपत्ती विद्रूप न करण्यासंदर्भात अट घालावी, अशी सूचना न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने केली. केंद्रीय व निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना किंवा उमदेवारांना घातलेल्या वेगवेगळ्या अटी किंवा नियमांबरोबरच बेकायदा बॅनर्स, होर्डिंग किंवा पोस्टर्स लावून शहराचा चेहरा विद्रूप न करण्याच्या अटीचा किंवा नियमाचा समावेश करणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले.बेकायदा होर्डिंग, बॅनर्स आणि पोस्टर्स हटवण्याच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी दोन सदस्यांची समिती नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्यात नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश करा, असेही खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले.स्थानिक सुकाणू अधिकारी (नोडल आॅफिसर), स्थानिक पोलीस, नागरी व महसूल अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला या द्विसदस्यीय समितीला अहवाल सादर करावा आणि ही समिती कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित राजकीय पक्षांची नावे सरकारच्या संकेतस्थळावर टाकतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस काहीच कारवाई केली जात नाही, अशी तक्रारही काही याचिकाकर्त्यांनी खंडपीठाकडे केली. याची दखल घेत, उच्च न्यायालयाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या इनचार्जला कोणी बेकायदा होर्डिंग, बॅनर्सकिंवा पोस्टर्ससंबंधी तोंडी तक्रार केली, तरी त्या तक्रारीची दखल घेऊन एफआयआर करण्याचे निर्देश दिले. ‘जर तुम्ही (पोलीस) कारवाई केली नाहीत, तर तुमच्याविरुद्ध आदेशाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करू, तसेच खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश देऊ,’ अशी तंबीच उच्च न्यायालयाने पोलिसांना दिली. (प्रतिनिधी) होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेशबेकायदा होर्डिंग, बॅनर्स किंवा पोस्टर्स लावून शहराचा चेहरा विद्रूप करण्यात येतो, तसेच स्थानिक संस्थांचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात येत असल्याने, अशा प्रकारचे बेकायदा कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश संबंधित स्थानिक संस्थांना व सरकारला द्यावा, अशी मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशन व मुंबईच्या जनहित मंच या एनजीओंचा समावेश आहे.