शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

Palghar bypolls 2018: मुख्यमंत्र्यांनंतर गडकरींनी सांगितला 'साम-दाम-दंड-भेद'चा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 12:34 IST

देवेंद्र फडणवीस हे नियमबाह्य बोलणाऱ्यांपैकी नाहीत.

मुंबईः पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत गाजलेल्या 'साम-दाम-दंड-भेद' या नीतीचा अर्थ सांगत आज केंद्रीय मंत्री भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली. 

देवेंद्र फडणवीस हे नियमबाह्य बोलणाऱ्यांपैकी नाहीत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी जी उक्ती वापरली, त्या साम-दाम-दंड-भेदचा अर्थ पूर्ण ताकदीने लढा, असा होतो. त्यात गैर काहीच नाही, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. 

पालघर पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली होती. ही निवडणूक जिंकणे दोन्ही पक्षांसाठी किती प्रतिष्ठेचं झालं आहे, याचा प्रत्यय प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप ऐकवली होती. त्यातील मुख्यमंत्र्यांची भाषा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते', असं मुख्यमंत्री म्हणाले होते. साम-दाम-दंड-भेद या त्यांच्या शब्दांनी तर खळबळच उडवून दिली होती. परंतु, दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं ऐकवलेल्या ऑडिओ क्लीपच्या सुरुवातीचा आणि शेवटचा भाग मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत ऐकवला होता. 

'आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. पण सत्तेचा कधीच दुरुपयोग करत नाही. मात्र, असा दुरुपयोग कुणी करायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, ही मानसिकता निवडणुकीत ठेवली पाहिजे', हे त्याच ऑडिओ क्लीपमधील पुढचे संवाद ऐकवत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर पलटवार केला होता. साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता गडकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत.

मशीन बंद पडणं ही गंभीर बाब!

लोकसभेच्या पोटनिवडणुकांसाठी काल झालेल्या मतदानावेळी बऱ्याच केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. या ईव्हीएम बिघाडाबाबत नितीन गडकरींना विचारलं असता, हे प्रकार दुःखद असून निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याचवेळी, ईव्हीएम घोटाळ्याचा विषय त्यांनी साफ उडवून लावला. पंजाबमध्ये काँग्रेस जिंकला तेव्हा ईव्हीएम चांगलं, पण उत्तर प्रदेशात आम्ही जिंकलो तेव्हा ईव्हीएम घोटाळा, याला काहीच अर्थ नाही. हा अत्यंत तथ्यहीन विषय असल्याची टिप्पणी त्यांनी केली.  

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018