शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत राज्यातील सिंचन 40 टक्क्यांवर नेणार, नितीन गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 23:52 IST

सद्यस्थितीत महाराष्ट्रात २२ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे. शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर सिंचनक्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे.

नागपूर, दि. 17 - सद्यस्थितीत महाराष्ट्रात २२ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे. शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर सिंचनक्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच शेतकरी आत्महत्या कमी होतील. पुढील दोन वर्षांत राज्यातील सिंचन ४० टक्क्यांवर नेणार, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तकाचे रविवारी त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी गडकरी बोलत होते.

आपल्या देशात पंचवार्षिक योजना ज्या दिशेने गेली, त्यावर विचार करण्याची गरज आहे. समाजवाद, साम्यवाद आणि ‘पुंजीवाद’ या चक्रात कृषी धोरण आखताना गोंधळ झाला. सिंचनासाठी ज्यावेळी निधी देणे अपेक्षित होते तेव्हा एअर इंडियासाठी ७० हजार कोटींची विमाने विकत घेण्यात आली. मुळात आजच्या तारखेत सिंचनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. धरणे भरली असताना शेतकºयांना पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे योग्य धोरण आखून सिंचन क्षमता वाढविण्यावर आमचा भर आहे. नदीजोड प्रकल्पात राज्यामध्ये प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे निश्चित सिंचन वाढेल, असे गडकरी म्हणाले. तांदूळ, गहू, कापसासारख्या पिकांमुळे शेती फायद्यात येऊ शकत नाही. या पिकांना वाढीव भाव देणेदेखील शक्य नाही. त्यामुळे शेतीला पूरक उद्योग शेतकºयांनी सुरू केले तर त्यांचे उत्पन्न सहज वाढू शकते, असे गडकरी म्हणाले. यावेळी डॉ. निंबाळकर यांनी पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. शोभा फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. कर्जमाफीमुळे शेतकºयांच्या समस्या कधीच सुटणार नाहीत. शेतकºयांच्या मानसिकतेचा विचार करून धोरणे आखायला हवीत. विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

...अन्यथा आपल्यावरील विश्वास संपेल

शेतीच्या समस्यांवर आंदोलन करणे सोपे असते. मात्र त्यावर मार्ग काढणे जास्त आवश्यक आहे. विरोधी पक्षात असताना आम्ही आंदोलने केली. आता सगळीकडेच आमची सत्ता आहे. त्यामुळे मी जनप्रतिनिधींना म्हणतो की चर्चा करण्यापेक्षा उत्तरे शोधा. अन्यथा जनतेचा आपल्यावरील विश्वास संपेल, असे गडकरी यावेळी म्हणाले.

दिल्लीला पाण्याचे दु:ख कळलेच नाही

उत्तर भारतात सिंचनाची फारशी समस्या नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यातील लोकांचे पाण्याचे दु:ख माहीत नाही. आपण आजपर्यंत आपले दु:ख व समस्या योग्य पद्धतीने मांडू शकलो नाही व त्यांनादेखील पाण्याचे दु:ख कळले नाही. मात्र आता काहीही झाले तरी सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी