शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नितीन आगे खून खटला; शासनाचे अपील दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:13 IST

खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करणा-या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सरकार पक्षाने शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.

औरंगाबाद : खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करणा-या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सरकार पक्षाने शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.या खटल्यासंदर्भातील ‘फौजदारी जनहित याचिके’च्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे दोन दिवसांत अपील दाखल करण्यात येईल, असे निवेदन खंडपीठात करण्यात आले होते. नितीन आगेच्या शवविच्छेदन अहवालात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली नसून त्याचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी डॉ. युवराज कराडे व डॉ. संजीव मुंडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे. शवविच्छेदन अहवालात त्याच्या अंगावर मारहाणीच्या आठ जखमा आढळल्या. त्याला काठी आणि हतोडीने मारहाण केल्याचे समोर आले. नितीनची आई रेखा, बहीण रूपाली सोनुने व दुर्गा आगे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे.नितीनला शाळेत मारहाण करण्यात आली असून, कान्होबा मंदिराजवळ तो पडल्याची माहिती आरोपींनी नितीनच्या आईला दिली होती, तर ‘नितीनचे कामच केले आहे,’ असे आरोपीने दोन्ही बहिणींना सांगितले होते. हे मुद्दे युक्तिवादासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आरोपींकडून काठी व हतोडी जप्त करण्यात आली आहे. नितीनचे ओळखपत्र व मोबाईल आरोपींनी लपवून ठेवले होते.२६ पैकी १४ साक्षीदार फितूरबारावीत शिकत असलेल्या नितीनची २८ एप्रिल २०१४ रोजी हत्या झाली होती. सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. नितीनचे त्याच्या शाळेतील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी नितीनला मारहाण करून त्याची हत्या केली होती, अशी फिर्याद त्याचे वडील राजू आगे यांनी दिली होती. २६ पैकी १४ साक्षीदार फितूर झाले आहेत. हत्या प्रकरणात सचिन गोलेकर, शेषराव येवले, नीलेश गोलेकर, विनोद गटकळ, भूजंग गोलेकर यांच्याविरुद्ध हत्या करणे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद