शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नितीन आगे खून खटला; शासनाचे अपील दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:13 IST

खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करणा-या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सरकार पक्षाने शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.

औरंगाबाद : खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करणा-या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सरकार पक्षाने शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.या खटल्यासंदर्भातील ‘फौजदारी जनहित याचिके’च्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे दोन दिवसांत अपील दाखल करण्यात येईल, असे निवेदन खंडपीठात करण्यात आले होते. नितीन आगेच्या शवविच्छेदन अहवालात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली नसून त्याचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी डॉ. युवराज कराडे व डॉ. संजीव मुंडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे. शवविच्छेदन अहवालात त्याच्या अंगावर मारहाणीच्या आठ जखमा आढळल्या. त्याला काठी आणि हतोडीने मारहाण केल्याचे समोर आले. नितीनची आई रेखा, बहीण रूपाली सोनुने व दुर्गा आगे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे.नितीनला शाळेत मारहाण करण्यात आली असून, कान्होबा मंदिराजवळ तो पडल्याची माहिती आरोपींनी नितीनच्या आईला दिली होती, तर ‘नितीनचे कामच केले आहे,’ असे आरोपीने दोन्ही बहिणींना सांगितले होते. हे मुद्दे युक्तिवादासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आरोपींकडून काठी व हतोडी जप्त करण्यात आली आहे. नितीनचे ओळखपत्र व मोबाईल आरोपींनी लपवून ठेवले होते.२६ पैकी १४ साक्षीदार फितूरबारावीत शिकत असलेल्या नितीनची २८ एप्रिल २०१४ रोजी हत्या झाली होती. सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. नितीनचे त्याच्या शाळेतील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी नितीनला मारहाण करून त्याची हत्या केली होती, अशी फिर्याद त्याचे वडील राजू आगे यांनी दिली होती. २६ पैकी १४ साक्षीदार फितूर झाले आहेत. हत्या प्रकरणात सचिन गोलेकर, शेषराव येवले, नीलेश गोलेकर, विनोद गटकळ, भूजंग गोलेकर यांच्याविरुद्ध हत्या करणे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद