शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

निसर्ग चक्रीवादळ आज रायगडला धडकणार; संचारबंदी जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 06:43 IST

आपत्कालीन यंत्रणा सतर्क : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/अलिबाग/पालघर : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करीत असून बुधवारी दुपारी ते अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात परिसरात ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. रायगडच्या किनारपट्टी भागातून ४० हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भारतीय नौसेना, भारतीय तटरक्षक दल व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईसह कोकणात चक्रीवादळ सहसा धडकत नाहीत. २००९ साली फियान चक्रीवादळ मुंबईजवळच्या किनारपट्टीला धडकले होते. हा अपवाद वगळता या आपत्तीचा सामना करण्याची वेळ आता आल्याने खबरदारी म्हणून रायगड आणि पालघर जिल्ह्यांत एनडीआरएफच्या १५, एसडीआरएफच्या पाच तुकड्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून पाच तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अरबी समुद्रातील चक्रीवादळ पणजीपासून २८० किमी, मुंबईपासून ४३० किमी आणि सुरतपासून ६४० किमी अंतरावर होते. ताशी ११ किलोमीटर या वेगाने ते उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढच्या बारा तासांमध्ये याचा वेग आणखी वाढेल. बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळी ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्याचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग ओलांडेल. यावेळी येथे ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील आणि किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडेल.173000नागरिक प्रभावित होण्याची शक्यताअलिबाग : रायगडमधील सात तालुक्यांतील समुद्र तसेच खाडी किनाऱ्यांवरील ६० गावांमधील सुमारे एक लाख ७३ हजार नागरिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यातील तब्बल ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.सिंधुदुर्गात समुद्राच्या लाटांची उंची वाढलीकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गमध्ये मंगळवार दुपारी साडेबारानंतर समुद्राच्या लाटांची उंची वाढली असून वाºयाने जोर धरण्यास सुरुवात केल्याने किनारपट्टी भागात घबराटीचे वातावरण आहे. रत्नागिरीतही अशीच स्थिती आहे.पालघर किनारपट्टीवर दहशत;ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणारडहाणू तालुक्यातील किनाºयावरील सतीपाडा, दिवादांडी, मांगेलवाडा, आगर, नरपड, धाकटी डहाणू, तडियाले, गुंगवाडा, घोलवड, बोर्डी आदी भागातील नागरिकांना सुरक्षितता म्हणून प्रशासनाने केएल पोंदा हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल व दोन सभागृहांत हलविले आहे.याच भागाला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. किनाºयावर वादळपूर्व स्थिती निर्माण होत असून मंगळवारी दुपारपासूनच पावसाच्या हलक्या सरींची रिपरिप सुरू आहे. मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करण्यास प्रशासनाने अगोदरच मनाई केली आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ