शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case: ‘माझ्या देशात महिलांना न्याय मिळतोच याचा मला अभिमान, पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 09:52 IST

देशभरात अशाप्रकारची जी प्रकरणं आहेत ती सगळी जलदगतीने ३ महिन्यात सोडवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.

ठळक मुद्दे चारही आरोपींना एकत्र फाशी दिली ही पहिलीच घटना आहे,गेल्या साडेसात वर्षापासून निर्भयाचे आई-वडील हिंमतीने ही लढाई लढलेमाझ्या देशात महिलांना न्याय मिळतो याचा मला अभिमान आहे

नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील दोषींना अखेर तिहार जेलमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास फासावर लटकवले. या शिक्षेमुळे संपूर्ण देशभरात न्यायालयाचे आभार मानले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत न्यायालयात याबाबतच्या याचिकांवर सुनावणी सुरु होती. मात्र न्यायालयाने सर्व याचिका फेटाळत अखेर निर्भयाला न्याय देण्याचं काम केलं त्याच कौतुक सगळेच करत आहेत.

याबाबत खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या की, रात्री १२ वाजता न्यायालयाने निर्भया प्रकरणात जो निर्णय घेतला त्याबद्दल एक भारतीय महिला म्हणून मी आभार मानते, गेल्या साडेसात वर्षापासून निर्भयाचे आई-वडील हिंमतीने ही लढाई लढले, संपूर्ण देश या निर्णयाची वाट पाहत होता. अखेर न्याय मिळाला, माझ्या देशात महिलांना न्याय मिळतो याचा मला अभिमान आहे असं त्यांनी सांगितले

तसेच देशभरात अशाप्रकारची जी प्रकरणं आहेत ती सगळी जलदगतीने ३ महिन्यात सोडवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. यातील आरोपींना फाशी देण्यात यावी ही अपेक्षा आहे. चारही आरोपींना एकत्र फाशी दिली ही पहिलीच घटना आहे, यापुढेही महिलांना असाच न्याय मिळेल अशी खात्री आहे असं मत खासदार नवनीत कौर राणा यांनी व्यक्त केलं.  

दरम्यान, गुन्हेगारांना वाचविण्यासाठी ज्या पद्धतीने एक याचिका ठेवण्यात आली होती, त्यानुसार कोर्टाने सर्व याचिका एक-एक करून फेटाळून लावल्या, पण शेवटी मला न्याय मिळाला. अगदी उशीरा, पण आमच्या न्यायव्यवस्थेने हे सिद्ध केले की जे देशातील मुलींना लक्ष्य करतात त्यांना सोडलं जाणार नाही. राज्यघटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होते. पण, या कारवाईमुळे देशाच्या न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा विश्वास कायम राहील हे सिद्ध झालं. आम्ही निर्भयाला न्याय मिळावा म्हणून लढा देत होतो पण देशातील मुलींसाठी हा लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई आशादेवी यांनी शिक्षेनंतर दिली.

काय आहे प्रकरण?

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. देशाच्या राजधानीत झालेल्या या क्रूर प्रकारामुळे संपूर्ण देश हादरला होता. तसेच सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींविरोधात न्यायालयीन लढा सुरू झाला होता. त्यात एक आरोपी अल्पवयीन निघाल्याने त्याची सुटका झाली होती. उर्वरित आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, एका आरोपीने कारागृहातच आत्महत्या केली होती.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपnavneet kaur ranaनवनीत कौर राणा