शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

परतीच्या पावसाचे नऊ बळी, राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:17 IST

राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असून, शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर व दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरी बरसल्या.

मुंबई/पुणे : राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असून, शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर व दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरी बरसल्या. मुंबईत दुपारी चारनंतर अंधार दाटला आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला. वीज पडून पालघर, धुळ्यात प्रत्येकी तीन, सोलापूरमध्ये दोन तर मुंबईत एकाचा असे एकूण नऊ बळी गेले आहेत.

६ ते ११ आॅक्टोबर कालावधीत विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने दिला होता. मुंबईत भरदुपारी रात्रीसारखे वातावरण झाले होते. वरळी येथील प्रवीण तुकाराम जाधव (३५) यांच्या शेजारी वीज पडल्याने धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धुळे जिल्ह्यात गव्हाणे येथे सुरेखाबाई दगडू पाटील (५०) व त्यांची मुलगी मोनिका (१८) आणि वाठोडा येथे उखुबाई दारासिंग पावरा (२०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हिवरे येथे पांडुरंग चांगदेव लबडे (६५) व पापरी योगेश सुनील भोसले (२०) यांचा वीज पडून मृत्यू झाला.राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ७ ते ९ आणि विदर्भात ७ व ८ आॅक्टोबरला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.पालघर, डहाणू, विक्र मगड, वसई तालुक्यात संध्याकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मनोर जवळील म्हसकर पाड्यातील संगीता सखाराम सुतार (४१), आंबेदा येथील वसंत कृष्णा पाटील (५४) तर विक्र मगडमध्ये एकनाथ काशीनाथ शेलार (३५ रा. केव) या तिघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. -वृत्त/२

टॅग्स :Rainपाऊस