शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

परतीच्या पावसाचे नऊ बळी, राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:17 IST

राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असून, शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर व दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरी बरसल्या.

मुंबई/पुणे : राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असून, शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर व दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरी बरसल्या. मुंबईत दुपारी चारनंतर अंधार दाटला आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला. वीज पडून पालघर, धुळ्यात प्रत्येकी तीन, सोलापूरमध्ये दोन तर मुंबईत एकाचा असे एकूण नऊ बळी गेले आहेत.

६ ते ११ आॅक्टोबर कालावधीत विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने दिला होता. मुंबईत भरदुपारी रात्रीसारखे वातावरण झाले होते. वरळी येथील प्रवीण तुकाराम जाधव (३५) यांच्या शेजारी वीज पडल्याने धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धुळे जिल्ह्यात गव्हाणे येथे सुरेखाबाई दगडू पाटील (५०) व त्यांची मुलगी मोनिका (१८) आणि वाठोडा येथे उखुबाई दारासिंग पावरा (२०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हिवरे येथे पांडुरंग चांगदेव लबडे (६५) व पापरी योगेश सुनील भोसले (२०) यांचा वीज पडून मृत्यू झाला.राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ७ ते ९ आणि विदर्भात ७ व ८ आॅक्टोबरला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.पालघर, डहाणू, विक्र मगड, वसई तालुक्यात संध्याकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मनोर जवळील म्हसकर पाड्यातील संगीता सखाराम सुतार (४१), आंबेदा येथील वसंत कृष्णा पाटील (५४) तर विक्र मगडमध्ये एकनाथ काशीनाथ शेलार (३५ रा. केव) या तिघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. -वृत्त/२

टॅग्स :Rainपाऊस