शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

चोख बंदोस्तात 'नीट- २' सुरळीत

By admin | Updated: July 24, 2016 20:28 IST

नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 24 - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. औरंगाबादेतील १३ केंद्रांवर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनीच रविवारी ही परीक्षा दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा झाली. गेल्या वर्षी हीच परीक्षा प्री मेडिकल एंट्रन्स टेस्ट म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती परीक्षाच रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल एंट्रन्स इलिजीबिलीटी टेस्ट अर्थात नीट-२ ही परीक्षा आज २४ जुलै रोजी औरंगाबादेतील १३ केंद्रांवर घेण्यात आली. मराठवाडा, खान्देश, विदर्भाचे काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील ५ हजार ९०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दिल्ली येथून सीबीएसईह्णचे २८ अधिकारी रविवारी औरंगाबादेत तळ ठोकून होते. यातील ८ अधिकाऱ्यांच्या पथकांनी सर्व केंद्रांना सतत भेटी दिल्या. परीक्षा केंद्रांवर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्षात सकाळी ९.३० वाजेपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे किमान १ तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. मात्र, बहुतांशी परीक्षा केंद्रे ही शहराबाहेर ह्यसीबीएसई शाळांमध्ये असल्यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना केंद्रांपर्यंत पोहोचण्यास १०-१५ मिनिटे उशीर झाला. त्यामुळे अशा अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यात आले नाही. दुरून आल्यानंतरही परीक्षेपासून मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विनंती केल्यानंतरही त्यांना केंद्रांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही.सीबीएसईचे जाचक निर्बंधसर्व केंद्रांच्या मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरमार्फत विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आला. केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल, कॅलक्युलेटर, टोपी, अंगठी, ब्रेसलेट, मनगटी घड्याळ, पादत्राणे, पेन-पेन्सिल नेण्यास मनाई होती. केंद्रामध्येच विद्यार्थ्यांना पेन-पेन्सिल देण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गणवेश संहिताही लागू करण्यात आलेली होती. माळीवाडा येथील जैन इंटरनॅशनल स्कूलने या परीक्षेत समन्वयकाची भूमिका बजावली. भौतिकशास्त्राचा पेपर कठीण गेल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.