शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

चोख बंदोस्तात 'नीट- २' सुरळीत

By admin | Updated: July 24, 2016 20:28 IST

नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 24 - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. औरंगाबादेतील १३ केंद्रांवर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनीच रविवारी ही परीक्षा दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा झाली. गेल्या वर्षी हीच परीक्षा प्री मेडिकल एंट्रन्स टेस्ट म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती परीक्षाच रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल एंट्रन्स इलिजीबिलीटी टेस्ट अर्थात नीट-२ ही परीक्षा आज २४ जुलै रोजी औरंगाबादेतील १३ केंद्रांवर घेण्यात आली. मराठवाडा, खान्देश, विदर्भाचे काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील ५ हजार ९०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दिल्ली येथून सीबीएसईह्णचे २८ अधिकारी रविवारी औरंगाबादेत तळ ठोकून होते. यातील ८ अधिकाऱ्यांच्या पथकांनी सर्व केंद्रांना सतत भेटी दिल्या. परीक्षा केंद्रांवर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्षात सकाळी ९.३० वाजेपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे किमान १ तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. मात्र, बहुतांशी परीक्षा केंद्रे ही शहराबाहेर ह्यसीबीएसई शाळांमध्ये असल्यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना केंद्रांपर्यंत पोहोचण्यास १०-१५ मिनिटे उशीर झाला. त्यामुळे अशा अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यात आले नाही. दुरून आल्यानंतरही परीक्षेपासून मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विनंती केल्यानंतरही त्यांना केंद्रांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही.सीबीएसईचे जाचक निर्बंधसर्व केंद्रांच्या मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरमार्फत विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आला. केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल, कॅलक्युलेटर, टोपी, अंगठी, ब्रेसलेट, मनगटी घड्याळ, पादत्राणे, पेन-पेन्सिल नेण्यास मनाई होती. केंद्रामध्येच विद्यार्थ्यांना पेन-पेन्सिल देण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गणवेश संहिताही लागू करण्यात आलेली होती. माळीवाडा येथील जैन इंटरनॅशनल स्कूलने या परीक्षेत समन्वयकाची भूमिका बजावली. भौतिकशास्त्राचा पेपर कठीण गेल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.