शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

चोख बंदोस्तात 'नीट- २' सुरळीत

By admin | Updated: July 24, 2016 20:28 IST

नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 24 - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. औरंगाबादेतील १३ केंद्रांवर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनीच रविवारी ही परीक्षा दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा झाली. गेल्या वर्षी हीच परीक्षा प्री मेडिकल एंट्रन्स टेस्ट म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती परीक्षाच रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल एंट्रन्स इलिजीबिलीटी टेस्ट अर्थात नीट-२ ही परीक्षा आज २४ जुलै रोजी औरंगाबादेतील १३ केंद्रांवर घेण्यात आली. मराठवाडा, खान्देश, विदर्भाचे काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील ५ हजार ९०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दिल्ली येथून सीबीएसईह्णचे २८ अधिकारी रविवारी औरंगाबादेत तळ ठोकून होते. यातील ८ अधिकाऱ्यांच्या पथकांनी सर्व केंद्रांना सतत भेटी दिल्या. परीक्षा केंद्रांवर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्षात सकाळी ९.३० वाजेपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे किमान १ तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. मात्र, बहुतांशी परीक्षा केंद्रे ही शहराबाहेर ह्यसीबीएसई शाळांमध्ये असल्यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना केंद्रांपर्यंत पोहोचण्यास १०-१५ मिनिटे उशीर झाला. त्यामुळे अशा अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यात आले नाही. दुरून आल्यानंतरही परीक्षेपासून मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विनंती केल्यानंतरही त्यांना केंद्रांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही.सीबीएसईचे जाचक निर्बंधसर्व केंद्रांच्या मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरमार्फत विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आला. केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल, कॅलक्युलेटर, टोपी, अंगठी, ब्रेसलेट, मनगटी घड्याळ, पादत्राणे, पेन-पेन्सिल नेण्यास मनाई होती. केंद्रामध्येच विद्यार्थ्यांना पेन-पेन्सिल देण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गणवेश संहिताही लागू करण्यात आलेली होती. माळीवाडा येथील जैन इंटरनॅशनल स्कूलने या परीक्षेत समन्वयकाची भूमिका बजावली. भौतिकशास्त्राचा पेपर कठीण गेल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.