शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

साध्वी प्रज्ञासिंहला एनआयएची क्लीन चिट

By admin | Updated: May 14, 2016 03:21 IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्र वारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली असून

तुरुंगातून सुटकेचा मार्ग झाला सुकरमुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्र वारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली असून, कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावरील मकोकातंर्गत आरोप हटवले आहेत. यामुळे प्रज्ञासिंह व पुरोहित यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रज्ञासिंहच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग सुकर झाला असून, पुरोहितही जामिनावर बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बॉम्बस्फोटातील प्रज्ञाचा सहभाग स्पष्ट करणारे ठोस पुरावे मिळाले नसल्याचे एनआयएने मागच्या महिन्यात म्हटले होते. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २00८ मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात पुरोहितचाही समावेश होता. बाइकवरील दोन बॉम्बच्या स्फोटांत सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु वातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तकालकी यांनाही अटक झाली होती. यापूर्वीच एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर व पुरोहित यांच्यावर लावण्यात आलेला मकोका हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते.केंद्रात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव स्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोप करण्यात आला होता.हा खटला चालवणाऱ्या सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सालियन यांनीच तशी तक्रार केली होती. आपणावर दबाव येत असल्याची तक्रार करताना त्यांनी एनआयएचे अधीक्षक सुहास वारके यांचे नावही घेतले होते. त्यामुळे हे प्रकरण यापुढेही सौम्यपणे हाताळले जाईल, अशी चर्चा सुरू आहे.कडव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश एनआयएकडून आल्याचा आरोपही त्यांनी गेल्या वर्षी केला होता. काँग्रेसची टीकाआपल्या परिवारातील मंडळींना सोडून देण्यासाठी भाजपाने आणि मोदी सरकारने हे चालवले आहे. या पद्धतीने आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्याचा प्रकार अतिशय चुकीचा आहे.- दिग्विजयसिंह, काँग्रेस नेते >हेमंत करकरे यांच्या तपासावर शंकाएनआयएनच्या आधी तपासाचे काम महाराष्ट्र एटीएसकडे होते आणि हेमंत करकरे यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. पण नंतर तपास एनआयएकडे गेला. एनआयएने एटीएसच्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली आहे. तसेच पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या मुंबई हल्ल्यात लढताना हुतात्मा झालेल्या स्व. करकरे यांच्याविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. हा तपास हेमंत करकरे यांनी सुरू करून प्रज्ञासिंगसह अनेकांना अटक करताच, भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. टीका करणाऱ्यांमध्ये लालकृष्ण अडवाणी आणि शिवराजसिंग चौहान हेही होते. >साक्षी-पुराव्यांच्या मूल्यमापनानुसार प्रज्ञासिंहविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. कारण साक्षीदाराने दिलेली साक्ष मागे घेतल्याने प्रज्ञाविरुद्ध कायदेशीर मुद्दाच राहत नाही, असे ‘एनआयए’ने म्हटले आहे.