शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

साध्वी प्रज्ञासिंहला एनआयएची क्लीन चिट

By admin | Updated: May 14, 2016 03:21 IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्र वारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली असून

तुरुंगातून सुटकेचा मार्ग झाला सुकरमुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्र वारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली असून, कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावरील मकोकातंर्गत आरोप हटवले आहेत. यामुळे प्रज्ञासिंह व पुरोहित यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रज्ञासिंहच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग सुकर झाला असून, पुरोहितही जामिनावर बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बॉम्बस्फोटातील प्रज्ञाचा सहभाग स्पष्ट करणारे ठोस पुरावे मिळाले नसल्याचे एनआयएने मागच्या महिन्यात म्हटले होते. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २00८ मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात पुरोहितचाही समावेश होता. बाइकवरील दोन बॉम्बच्या स्फोटांत सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु वातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तकालकी यांनाही अटक झाली होती. यापूर्वीच एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर व पुरोहित यांच्यावर लावण्यात आलेला मकोका हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते.केंद्रात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव स्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोप करण्यात आला होता.हा खटला चालवणाऱ्या सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सालियन यांनीच तशी तक्रार केली होती. आपणावर दबाव येत असल्याची तक्रार करताना त्यांनी एनआयएचे अधीक्षक सुहास वारके यांचे नावही घेतले होते. त्यामुळे हे प्रकरण यापुढेही सौम्यपणे हाताळले जाईल, अशी चर्चा सुरू आहे.कडव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश एनआयएकडून आल्याचा आरोपही त्यांनी गेल्या वर्षी केला होता. काँग्रेसची टीकाआपल्या परिवारातील मंडळींना सोडून देण्यासाठी भाजपाने आणि मोदी सरकारने हे चालवले आहे. या पद्धतीने आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्याचा प्रकार अतिशय चुकीचा आहे.- दिग्विजयसिंह, काँग्रेस नेते >हेमंत करकरे यांच्या तपासावर शंकाएनआयएनच्या आधी तपासाचे काम महाराष्ट्र एटीएसकडे होते आणि हेमंत करकरे यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. पण नंतर तपास एनआयएकडे गेला. एनआयएने एटीएसच्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली आहे. तसेच पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या मुंबई हल्ल्यात लढताना हुतात्मा झालेल्या स्व. करकरे यांच्याविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. हा तपास हेमंत करकरे यांनी सुरू करून प्रज्ञासिंगसह अनेकांना अटक करताच, भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. टीका करणाऱ्यांमध्ये लालकृष्ण अडवाणी आणि शिवराजसिंग चौहान हेही होते. >साक्षी-पुराव्यांच्या मूल्यमापनानुसार प्रज्ञासिंहविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. कारण साक्षीदाराने दिलेली साक्ष मागे घेतल्याने प्रज्ञाविरुद्ध कायदेशीर मुद्दाच राहत नाही, असे ‘एनआयए’ने म्हटले आहे.