शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरेंचे वचन

By admin | Updated: June 19, 2014 14:24 IST

शिवसैनिक हीच आमची खरी ताकड असून याच ताकदीच्या जोरावर आम्ही महाराष्ट्राचे महाभारत जिंकणार , पुढचा मुख्यमंत्री सेनेचाच असेल, असे वचन सामनातून देण्यात आले आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १९ - शिवसैनिक हीच आमची खरी ताकड असून याच ताकदीच्या जोरावर आम्ही महाराष्ट्राचे महाभारत जिंकणार, असे वचन शिवसेनेचे मुखपत्र असणा-या 'सामना'च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. शिवसेनेच्या ४८व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव यांनी 'सामना'त विशेष अग्रलेख लिहीला असून महाराष्ट्राला शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार असा विश्वासही या लेखात व्यक्त करण्यात आला आहे.
मोदींच्या रूपाने दिल्लीच्या तख्तावर एक मजबूत पंतप्रधान लाभला असून आता महाराष्ट्राच्या मजबुतीचा विडा उचलून शिवसेनेने विजयाचा बेलभंडारा उचलला आहे, असेही लेखात म्हटले आहे. तसेच या लेखात राज ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना अपशकून करण्याचा प्रयत्न झालाच, पण त्या सर्व शकुनीमामांना शिवसेना पुरून उरली असे सांगत राज यांचे नाव न घेता त्यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात - 
-  महाराष्ट्रावर भगवी विजयी पताका फडकवण्याचा यावर्षीचा सेनेचा संकल्प आहे.  शिवसेनेने अन्यायाविरुद्ध लढायचं, महाराष्ट्राला बळ देण्यासाठी द्वाही पुकारायची आणि दळभद्री कॉंग्रेसवाल्यांनी त्यावर गुळण्या टाकायच्या. याचा अंत होण्याची वेळ आता आली आहे. या हिंदुस्थानवर हिंदुत्वाचा जबरदस्त तेजपुंज भगवा फडकू दे! म्हणजे सत्ता काय असते, न्याय कशाला म्हणतात हे दाखविण्याची संधी मिळेल,’ हे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्नं पूर्ण झालं आहे. आता महाराष्ट्राचा उद्धार करण्याची वेळ आली आहे.
- ‘देशात जसे नरेंद्र मोदींचे एकहाती व एककलमी राज्य पूर्ण बहुमताने आले तसे एकवचनी पूर्ण बहुमताचे भगवे राज्य शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात यावे ही येथील तमाम जनतेची इच्छा आहे. 
- शिवसेना हे एक फार मोठे कुटुंब आहे. हे कुटुंब असले तरी इथे इस्टेटीचे झगडे नाहीत व खुर्च्यांचे वाद नाहीत. कुटुंबामध्ये झगडे असू शकतात, पण ज्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी झगडे केले आणि त्यासाठी जे बाहेर पडले ते शिवसेना सोडताच नेस्तनाबूत झाले.
- शिवसेनेला सतत आव्हाने दिली गेली. आधी शिवसेनाप्रमुख, नंतर आम्हीदेखील ती स्वीकारली. मग ती आव्हाने कॉंग्रेसवाल्यांची असोत किंवा राष्ट्रवादीवाल्यांची, घरफोड्यांची असोत अथवा घरभेद्यांची. कोणीही असो. त्यांनी आम्हाला जाहीर आव्हान द्यायचे आणि आम्ही ते स्वीकारायचे. हा शिवसेनेचा जणू स्थायिभावच झाला. त्यातूनच शिवसेना तावूनसुलाखून व कणखर पोलादाप्रमाणे बाहेर पडली आहे. 
- लोकसभा निवडणुकीतही शिवसेना उमेदवारांना अपशकून करण्याचा प्रयत्न झालाच, पण त्या सर्व शकुनीमामांना शिवसेना पुरून उरली व दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलीच. कारण शिवसेनेने केवळ पक्ष वा कार्यकर्ता बांधला नाही, तर एक पिढी उभी केलेली आहे.
- मंत्री, खासदार, आमदार नव्हे तर शिवसैनिक हीच खरी आमची ताकद आहे व या ताकदीवर आम्ही महाराष्ट्राचे महाभारत जिंकणार आहोत. आम्ही महाराष्ट्राला शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार आहोत, हे आमचे वचन आहे.